शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ शहरे होणार कोट्यधीश!

By admin | Updated: February 4, 2016 01:20 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : कोल्हापूर राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका

मुंबई/कोल्हापूर : नागरिकांनी स्वच्छतेचे सवयीत रूपांतर केले, तर महाराष्ट्र हे स्वच्छतेबाबत अव्वल राज्य होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्वच्छ नगरपालिकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ ३५ शहरांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी व कोल्हापूर महापालिकेचे महापौर आणि आयुक्त यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आला. यात मालवण नगरपरिषदेचा समावेश आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालक (प्रशासन) मीता लोचन उपस्थित होते. स्वच्छ शहरांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ‘अ’ वर्ग नगरपरिषदेस दोन कोटी रुपये, ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी १.५ कोटी रुपये, तर ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी १ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. अनुदानातील ३० टक्के निधी पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित रक्कम सहा महिन्यांनंतर पुन्हा तपासणी केल्यानंतर दिली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक साहाय्य मिळण्याकरिता जर्मन सरकारच्या सहकार्याने ‘जीआयझेड’ या संस्थेसोबत सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविकात नगरविकास सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी १ मे पूर्वी राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त तर २५ शहरे स्वच्छ करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पाचपेक्षा अधिक नगरपरिषदा हागणदारीमुक्त केल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांनी केला. या गौरव समारंभास महापालिकेच्यावतीने उपमहापौर सौ. शमा मुल्ला, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, नगरसेविका दीपा मगदूम, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते. ४शहरातील वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु शौचालय उपलब्ध नाही अशा सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी महापालिकेमार्फत अनुदान देण्याची योजना सुरू असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर रामाणे यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येत आहे. शहर हागणदारीमुक्त करणे व शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. या अभियानामध्ये राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महापालिका म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेचा गौरव झाला. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिकेच्या केलेल्या हागणदारीमुक्त दाव्याची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन पथकांमार्फत केली होती. या पथकामार्फत शहराच्या विविध भागांमध्ये कोल्हापूर शहर हागणदारी मुक्त झाल्याबाबतची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला होता.हागणदारीमुक्त नगरपरिषदा मुरगूड, गडहिंग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, रहिमतपूर, राजापूर, मालवण, चिखलदरा, मुरु ड-जंजिरा, पेण, कर्जत, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुला, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, दुधनी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैदर्गी, सांगोला, शिरपूर-वरवडे, फैजपूर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी. हागणदारीमुक्त महापालिका : कोल्हापूर महानगरपालिका. संपूर्ण स्वच्छ शहरे : पाचगणी, वेंगुर्ला, देवळाली प्रवरा. महिला नगराध्यक्षांचा पुढाकार हागणदारीमुक्त व स्वच्छ ३६ नगरपरिषदांपैकी २३ ठिकाणांच्या नगराध्यक्ष या महिला असून, त्यांनी पुढाकार घेऊन घरासोबत समाजही स्वच्छ ठेवू शकतो, असे सिद्ध करून दाखविले. ही अभिनंदनीय बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार : ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत पाचपेक्षा अधिक नगरपरिषदा हागणदारीमुक्त केल्याबद्दल पुणे विभागाचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव, सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यातील पहिली हागणदारीमुक्त महानगरपालिका म्हणून गौरव होणे ही बाब कोल्हापूर महानगरपालिकेला भूषणावह आहे. शहरातील नागरिकांच्या योगदानामुळे हे साध्य झाले. या पुढील काळातसुद्धा आम्ही असेच प्रयत्न करू तरीही कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. - अश्विनी रामाणे, महापौर नागरिकांनी स्वच्छतेचे सवयीत रूपांतर केल्यास स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र हे पहिले स्वच्छ राज्य ठरेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री