शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

पाचवी ते बारावीचे वर्ग सकाळी गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून माध्यमिक शाळा सकाळी साडेसात ते दुपारी बारा यावेळेत भरल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी दिनांक १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू होतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सकाळ सत्रातील शाळा सोमवारपासून भरविण्यात आल्या. सकाळी सात वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. त्यानंतर अर्ध्या तासामध्ये शाळांचा परिसर गजबजून गेला. प्रार्थना होऊन वर्ग भरले, त्यानंतर वेळापत्रकानुसार विविध विषयांचे तास घेण्यात आले. दुपारी बारा वाजता शाळा सुटली. जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे आरोग्याच्यादृष्टीने त्रासदायक ठरणार होते. त्याचा विचार करून आणि विविध शिक्षक संघटनांनी केलेल्या विनंतीनुसार सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यात आल्या. बहुतांश पालक त्यांच्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यासाठी आले होते. माध्यमिक शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचे परिपत्रक शनिवारी काढले. त्यामुळे काही शाळांना विद्यार्थ्यांना त्याबाबत सूचना देता आली नाही. या शाळांनी सोमवारी विद्यार्थ्यांना सूचना दिली असून, त्यातील काही शाळांनी आज (मंगळवार), तर काहींनी बुधवार (दि. १७)पासून सकाळी वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.

चौकट

प्राथमिक शाळा आजपासून सकाळी

जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आज (मंगळवार)पासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. त्याबाबतची सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना पत्रकाव्दारे सोमवारी दिली. जिल्ह्यात अशा १,९७६ शाळा असून, विद्यार्थी संख्या सुमारे ६० हजार आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून माध्यमिक शाळांनी सकाळच्या सत्रात वर्ग भरविले आहेत. सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना शाळांना केली आहे.

- किरण लोहार, माध्यमिक शिक्षणाधिकारी

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- सागर वातकर, शिक्षक, उषाराजे हायस्कूल

मी दहावीच्या वर्गात शिकत आहे. सध्या कडक उन्हाळा आहे. त्यामध्ये सकाळी वर्ग भरणे आम्हाला अभ्यासाच्यादृष्टीने उपयुक्त आहे. सकाळी वातावरण चांगले असते. त्यामुळे अभ्यासही चांगला होतो.

- सेजल सुतार, विद्यार्थिनी, विश्वकर्मा नगर, उजळाईवाडी.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा : १०५०

विद्यार्थी संख्या : २ लाख ५० हजार