शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील शंभर कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

By admin | Updated: April 1, 2017 19:00 IST

अन्वर जमादार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पात्र कर्जमाफीतील शंभर कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष अन्वर जमादार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जिल्हा बॅँकेने शेतकरी व विकास संस्थांच्या माध्यमातून नाबार्ड कडे मागणी न करता बॅँकेने मागणी केले तरच कायदेशीररित्या पैसे लवकर मिळू शकतील, अशी मागणीही बॅँकेकडे केल्याचे जमादार यांनी पत्रकात म्हटले आहे.

केंद्र सरकारने २००८ मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली पण कोल्हापूरातील सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे ११२ कोटी ८९ लाख रूपये अपात्र ठरविले. नाबार्डच्या वसुलीच्या परिपत्रकाला पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतकऱ्यांवरील अन्याय न्यायव्यवस्थेच्या निदर्शनास आणून दिला. गेले पाच-सहा वर्षे विविध संस्थांनी न्यायालयीन पातळीवर संघर्ष करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला.

दरम्यान, अपात्र रक्कमेबाबत उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल देत रक्कम पात्र ठरविली होती. पात्र रक्कम परत मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्याला पैसे मागण्याचा अधिकार नसून बॅँकेने पैसे मागितले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. आता जिल्हा बॅँकेने शेतकरी व विकास संस्थांना ठराव व्याजासह पात्र रक्कम मागणी करण्यास सांगितले आहे. हे चूकीचे असून उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार बॅँकेने याबाबतची मागणी केली तरच शेतकऱ्यांच्या हातात लवकर पैसे मिळू शकतात.

यापुर्वीच ११२ कोटी ८९ लाखा पैकी ११ कोटी ९९ लाख रूपये अपात्र ठरविल्याने बॅँकेने मागणी करताना १०० कोटी ९० लाखाची करणे अपेक्षित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्याचे अन्वर जमादार यांनी पत्रकात म्हटले आहे.