शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

वर्ग पाच अन् शिक्षक मात्र दोन

By admin | Updated: July 18, 2014 23:24 IST

किमान तीन शिक्षक मिळावेत : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

कुंभोज : आर.टी.ई.नुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीचे २०,५६७ वर्ग जोडण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. तथापि, बहुतांश डोंगरवस्तीतील ६० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाचवीपर्यंत दोन शिक्षक मंजूर आहेत. अशा शाळेत वर्ग पाच आणि शिक्षक दोन, अशा परिस्थितीत शिक्षकांनी शिकवायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करीत पाचवीपर्यंत किमान तीन शिक्षक मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी संघटनेच्यावतीने शासनाकडे केली आहे. आर.टी.ई. कायद्यानुसार पहिली ते पाचवीसाठी ६० विद्यार्थी पटास दोनच शिक्षक मंजूर असल्याने एका शिक्षकाला तीन वर्गांचे अध्यापन करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, म्हणून पहिली ते पाचवीसाठी किमान तीन, तर १६१ विद्यार्थीपटास सहावा शिक्षक मंजूर होणे आवश्यक आहे. शासनाने १५१ पटास मुख्याध्यापक पद मान्य केले असले, तरी शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठी पटाची अट न ठेवता पहिली ते सातवी अथवा आठवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक द्यावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर) शासन निर्णयाचे स्वागत चालू शैक्षणिक वर्षापासून प्राथमिक शाळेत राज्यभर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पाचवी ते आठवीच्या वर्गांना आताच शिक्षक देण्यात येणार असल्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. नवीन वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक करावी, या मागणीचा पाठपुरावा शासनाकडे केला होता. शासन निर्णयाचे संघटनेच्यावतीने स्वागत करीत असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.