शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

१५ दिवसांत दोन बळी : शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजनांची गरज

राम मगदूम ---गडहिंग्लज--पंधरा दिवसांत भरधाव वाहनांच्या धडकेत शहरातील दोन निष्पाप महिलांचा नाहक बळी गेला. या दुर्दैवी घटनांमुळे गडहिंग्लजच्या आबालवृद्धांसह शहरातून ये-जा करणारे नागरिक व प्रवाशांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किंबहुना सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याबरोबरच वाहतुकीची दैनंदिन कोंडी दूर करण्याची गरज आहे.‘गडहिंग्लज’ ही पूर्वीपासूनच सीमाभागातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. कर्नाटक-गोवा आणि कोकणला जोडणारे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाचे एक मध्यवर्ती केंद्रही आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरून गोवा व कोकणात आणि कोकण व गोव्यातून पुणे-बंगलोर महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते.सीमाभागातील जवळपास दहा साखर कारखान्यांकडे उसाची वाहतूक करणारी वाहनेदेखील गडहिंग्लजमधूनच जातात. त्यामुळे ऊसतोडणीच्या हंगामात गडहिंग्लज शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न गंभीर बनतो. गडहिंग्लज शहराच्या मध्यवस्तीतील मुख्य रस्ता दुपदरी असूनही त्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे वीरशैव बँकेनजीक काळभैरी वेस, कडगाव रोडवरील मुसळे कॉर्नर-कांबळे तिकटी, बसस्थानकासमोरील दसरा चौक व शिवाजी पुतळ्यानजीक वारंवार वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीमुळेच लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात. त्या अपघातानंतर उपाययोजनांची केवळ चर्चा होते. ठोस उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीसाठी आता जनरेट्याचीच आवश्यकता आहे.वाहतुकीची कोंडी दूर होण्यासाठी हे करायला हवेसंकेश्वर रोडवरील साई प्लाझा हॉटेल ते भडगाव रोडवरील मराठा चित्रमंदिर, आजरा रोडवरील अर्बन कॉलनी ते कडगाव रोडवरील एमएसईबी कार्यालय, कडगाव रोडवरील विश्रामगृह ते वडरगे रोडवरील बेलबाग आणि वडरगे रोडवरील बेलबाग ते काळभैरी रोडवरील लाखेनगर अशा नियोजित चार रिंगरोडची कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहतुकीची कोंडी दूर होईल.गारगोटीकडून येणारी अवजड वाहने व बसगाड्या चर्चरोड मार्गे बसस्थानक व मेनरोडवर आणावीत.वडरगेकडून शहरात येणारी अवजड वाहने व बसेस एमआर हायस्कूलवरून चर्चरोड मार्गे बसस्थानक व मेनरोडवर आणावीत.वीरशैव बँक ते नेहरू चौक आणि साधना बुकस्टॉल ते शिवाजी बँक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करावी.मार्केट यार्ड ते कोड्ड कॉलनी दरम्यान एकेरी वाहतूक आणि या मार्गावरील दोन्ही बाजूच्या दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवून विषम तारखांच्या पार्किंगचे वेळापत्रक काटेकोरपणे राबवायला हवे.भडगाव रोड व कचेरी रोडवरील दर्ग्यासमोरील मोकळ्या जागेत मालवाहतुकीचे टेम्पो आणि खासगी प्रवासी गाड्या थांबतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र, तर शहरात ठिकठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुरेशा वाहनतळांची व्यवस्था हवी.गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तालुक्यांतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडहिंग्लजला वाहतूक पोलीस शाखेची आवश्यकता आहे.आता तरी बोध घ्या ! १५ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्षकांना भेटून मुलाच्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या फरहत जलीलउद्दीन पाटील या माउलीचा मालमोटारीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ३ आॅक्टोबर २०१५ रोजी पतीच्या दुचाकीवरून नोकरीवर जाणाऱ्या महिलेचा इनोव्हाच्या धडकेमुळे मृत्यू झाला. या दोन निष्पाप व अभागी महिलांच्या नाहक बळीतून स्थानिक प्रशासन व पोलिसांनी बोध घ्यावा आणि नागरी सुरक्षेसंबंधी ठोस उपाययोजनेची मागणी आहे.