शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Updated: March 14, 2016 00:45 IST

कोल्हापुरात टंचाई : पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली; दोन उपसा पंप बंद

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. चारपैकी दोन उपसा पंप बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला असून, रविवारी दिवसभर शहरातील ए, बी, ई या वॉर्डांसह काही उपनगरांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेच्या सात टँकरनी सुमारे ५२ खेपांतून पाणी विविध भागांत वितरण केले. राधानगरी धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास आज, सोमवारची पहाट उजाडणार असल्याने सोमवारीही शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच कोल्हापूर शहरवासीयांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तत्पूर्वी संपूर्ण शहरातील कांही भागात पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे; तर पंचगंगा नदीतील पाणीपातळी खालावल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी शिंगणापूर बंधाऱ्यावरील पाणीउपसा करणारा एक उपसा पंप बंद पडल्याने यावर आधारित असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डांतील पाण्याच्या टाक्या भरणे अडचणीचे बनले. त्यामुळे शहरात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी कावळा नाका परिसर, राजारामपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, काही उपनगरांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर बंधाऱ्यानजीकचा एक उपसा पंप शनिवारी दुपारी बंद पडला. पाणीपातळी आणखी खालावल्याने रविवारी पहाटे दुसरा उपसा पंपही बंद पडला. त्यामुळे रविवारी दिवसभर दोनच पंपांवर पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडलेराधानगरी धरणातून सोडलेले पाणी रविवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहोचल्याने रविवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. या यंत्रणेने पंचगंगा नदीची पाहणी केली असता धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत कोगे धरणापर्यंत पोहोचले होते; पण तेथे पाणी अडविल्याने या पाहणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोगे धरणाचे सात दरवाजे खुले करण्यास भाग पाडले. तसेच राधानगरी धरणातून जादा पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात सर्वाधिक पाणीटंचाईची झळशिंगणापूर उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या ई वॉर्डातील कावळा नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या भागांत रविवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला; तर काही भागांत झालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी शिल्लक असणाऱ्या पाण्यावर निभावले, पण आज, सोमवारी नागरिकांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे.अवघ्या सात टँकरचा आधारशहरात अवघ्या सात टँकरनी रविवारी पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला. यासात टँकरद्वारे सुमारे ५२ ठिकाणी पाणी वितरण करण्यात आले. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यताराधानगरी बंधाऱ्यातून सोडलेले पाणी आज, सोमवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असल्याने त्यानंतर दुपारनंतर पूर्ण क्षमतेने पाणीउपसा झाल्यानंतर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी दिली.