शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शहराच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Updated: March 14, 2016 00:45 IST

कोल्हापुरात टंचाई : पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली; दोन उपसा पंप बंद

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. चारपैकी दोन उपसा पंप बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला असून, रविवारी दिवसभर शहरातील ए, बी, ई या वॉर्डांसह काही उपनगरांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेच्या सात टँकरनी सुमारे ५२ खेपांतून पाणी विविध भागांत वितरण केले. राधानगरी धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास आज, सोमवारची पहाट उजाडणार असल्याने सोमवारीही शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच कोल्हापूर शहरवासीयांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तत्पूर्वी संपूर्ण शहरातील कांही भागात पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे; तर पंचगंगा नदीतील पाणीपातळी खालावल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी शिंगणापूर बंधाऱ्यावरील पाणीउपसा करणारा एक उपसा पंप बंद पडल्याने यावर आधारित असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डांतील पाण्याच्या टाक्या भरणे अडचणीचे बनले. त्यामुळे शहरात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी कावळा नाका परिसर, राजारामपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, काही उपनगरांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर बंधाऱ्यानजीकचा एक उपसा पंप शनिवारी दुपारी बंद पडला. पाणीपातळी आणखी खालावल्याने रविवारी पहाटे दुसरा उपसा पंपही बंद पडला. त्यामुळे रविवारी दिवसभर दोनच पंपांवर पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडलेराधानगरी धरणातून सोडलेले पाणी रविवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहोचल्याने रविवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. या यंत्रणेने पंचगंगा नदीची पाहणी केली असता धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत कोगे धरणापर्यंत पोहोचले होते; पण तेथे पाणी अडविल्याने या पाहणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोगे धरणाचे सात दरवाजे खुले करण्यास भाग पाडले. तसेच राधानगरी धरणातून जादा पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात सर्वाधिक पाणीटंचाईची झळशिंगणापूर उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या ई वॉर्डातील कावळा नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या भागांत रविवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला; तर काही भागांत झालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी शिल्लक असणाऱ्या पाण्यावर निभावले, पण आज, सोमवारी नागरिकांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे.अवघ्या सात टँकरचा आधारशहरात अवघ्या सात टँकरनी रविवारी पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला. यासात टँकरद्वारे सुमारे ५२ ठिकाणी पाणी वितरण करण्यात आले. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यताराधानगरी बंधाऱ्यातून सोडलेले पाणी आज, सोमवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असल्याने त्यानंतर दुपारनंतर पूर्ण क्षमतेने पाणीउपसा झाल्यानंतर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी दिली.