शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

शहराच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Updated: March 14, 2016 00:45 IST

कोल्हापुरात टंचाई : पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली; दोन उपसा पंप बंद

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. चारपैकी दोन उपसा पंप बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला असून, रविवारी दिवसभर शहरातील ए, बी, ई या वॉर्डांसह काही उपनगरांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेच्या सात टँकरनी सुमारे ५२ खेपांतून पाणी विविध भागांत वितरण केले. राधानगरी धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास आज, सोमवारची पहाट उजाडणार असल्याने सोमवारीही शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच कोल्हापूर शहरवासीयांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तत्पूर्वी संपूर्ण शहरातील कांही भागात पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे; तर पंचगंगा नदीतील पाणीपातळी खालावल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी शिंगणापूर बंधाऱ्यावरील पाणीउपसा करणारा एक उपसा पंप बंद पडल्याने यावर आधारित असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डांतील पाण्याच्या टाक्या भरणे अडचणीचे बनले. त्यामुळे शहरात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी कावळा नाका परिसर, राजारामपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, काही उपनगरांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर बंधाऱ्यानजीकचा एक उपसा पंप शनिवारी दुपारी बंद पडला. पाणीपातळी आणखी खालावल्याने रविवारी पहाटे दुसरा उपसा पंपही बंद पडला. त्यामुळे रविवारी दिवसभर दोनच पंपांवर पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडलेराधानगरी धरणातून सोडलेले पाणी रविवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहोचल्याने रविवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. या यंत्रणेने पंचगंगा नदीची पाहणी केली असता धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत कोगे धरणापर्यंत पोहोचले होते; पण तेथे पाणी अडविल्याने या पाहणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोगे धरणाचे सात दरवाजे खुले करण्यास भाग पाडले. तसेच राधानगरी धरणातून जादा पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात सर्वाधिक पाणीटंचाईची झळशिंगणापूर उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या ई वॉर्डातील कावळा नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या भागांत रविवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला; तर काही भागांत झालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी शिल्लक असणाऱ्या पाण्यावर निभावले, पण आज, सोमवारी नागरिकांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे.अवघ्या सात टँकरचा आधारशहरात अवघ्या सात टँकरनी रविवारी पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला. यासात टँकरद्वारे सुमारे ५२ ठिकाणी पाणी वितरण करण्यात आले. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यताराधानगरी बंधाऱ्यातून सोडलेले पाणी आज, सोमवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असल्याने त्यानंतर दुपारनंतर पूर्ण क्षमतेने पाणीउपसा झाल्यानंतर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी दिली.