शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

शहराच्या तोंडचे ‘पाणी’ पळाले

By admin | Updated: March 14, 2016 00:45 IST

कोल्हापुरात टंचाई : पंचगंगा नदीतील पाणी पातळी खालावली; दोन उपसा पंप बंद

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीतील पाणीपातळी पूर्णपणे खालावल्याने पाणी उपसा करणारी यंत्रणा कोलमडून गेली आहे. चारपैकी दोन उपसा पंप बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला असून, रविवारी दिवसभर शहरातील ए, बी, ई या वॉर्डांसह काही उपनगरांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे महापालिकेच्या सात टँकरनी सुमारे ५२ खेपांतून पाणी विविध भागांत वितरण केले. राधानगरी धरणातून सोडलेले पाणी शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यास आज, सोमवारची पहाट उजाडणार असल्याने सोमवारीही शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्यातच कोल्हापूर शहरवासीयांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तत्पूर्वी संपूर्ण शहरातील कांही भागात पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्णत: आटला आहे; तर पंचगंगा नदीतील पाणीपातळी खालावल्याने त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. शनिवारी (दि. १२) दुपारी शिंगणापूर बंधाऱ्यावरील पाणीउपसा करणारा एक उपसा पंप बंद पडल्याने यावर आधारित असणाऱ्या ए, बी, ई वॉर्डांतील पाण्याच्या टाक्या भरणे अडचणीचे बनले. त्यामुळे शहरात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी कावळा नाका परिसर, राजारामपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, काही उपनगरांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. शिंगणापूर बंधाऱ्यानजीकचा एक उपसा पंप शनिवारी दुपारी बंद पडला. पाणीपातळी आणखी खालावल्याने रविवारी पहाटे दुसरा उपसा पंपही बंद पडला. त्यामुळे रविवारी दिवसभर दोनच पंपांवर पाणी उपसा करण्याचे काम सुरू होते.धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडलेराधानगरी धरणातून सोडलेले पाणी रविवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत न पोहोचल्याने रविवारी दुपारी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. या यंत्रणेने पंचगंगा नदीची पाहणी केली असता धरणातून सोडलेले पाणी दुपारपर्यंत कोगे धरणापर्यंत पोहोचले होते; पण तेथे पाणी अडविल्याने या पाहणी अधिकाऱ्यांनी पुन्हा पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून कोगे धरणाचे सात दरवाजे खुले करण्यास भाग पाडले. तसेच राधानगरी धरणातून जादा पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरात सर्वाधिक पाणीटंचाईची झळशिंगणापूर उपसा केंद्रावर आधारित असणाऱ्या ई वॉर्डातील कावळा नाका, राजारामपुरी, शाहूपुरी, टाकाळा परिसर, सम्राटनगर, राजेंद्रनगर, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ या भागांत रविवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला; तर काही भागांत झालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी शिल्लक असणाऱ्या पाण्यावर निभावले, पण आज, सोमवारी नागरिकांना पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे.अवघ्या सात टँकरचा आधारशहरात अवघ्या सात टँकरनी रविवारी पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला. यासात टँकरद्वारे सुमारे ५२ ठिकाणी पाणी वितरण करण्यात आले. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यताराधानगरी बंधाऱ्यातून सोडलेले पाणी आज, सोमवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणार असल्याने त्यानंतर दुपारनंतर पूर्ण क्षमतेने पाणीउपसा झाल्यानंतर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी दिली.