शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

शहर तापले; मार्केट गारठले

By admin | Updated: April 17, 2017 00:59 IST

कोल्हापूर @ ३९ डिग्री : कडक उन्हामुळे नागरिक हैराण

कोल्हापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने कोल्हापूरकर हैराण झाले आहेत. त्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. उष्णतेचा पारा गेल्या आठवड्यापासून ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने असह्य होणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी बहुतांश लोक दुपारचा वेळ घरातच घालवीत आहेत. रविवारी उष्णतेचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने दुपारनंतर शहरातील अधिकतर रस्ते हे ओस पडल्याचे, तर बाजारपेठांमध्ये शांतता पसरल्याचे दिसून आले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच यंदा उन्हाच्या झळा बसू लागल्या. मार्चमध्ये दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण होते. एप्रिलच्या सुरुवातीपासून उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक ऊन आणि झोंबणाऱ्या झळा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. अनेकांनी त्यापासून संरक्षणासाठी दुपारी बाहेर न पडता एक ते चार यावेळी घरात थांबण्याचा अथवा ज्यांचे फिरतीचे काम आहे, त्यांनी कार्यालय, बगीचा या ठिकाणी विश्रांती घेण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, सायबर चौक, आदी परिसरांतील नेहमी गजबजलेले रस्ते निर्मनुष्य होत आहेत.दुपारी बारापर्यंत आणि चारनंतर बाजारपेठेत लोकांची वर्दळ दिसून येत आहे. तापमानाचा पारा ३९ सेल्सिअस अंशांवर पोहोचल्याने रविवारी अनेक रस्ते दुपारच्या वेळी ओस पडले होते. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी या बाजारपेठांमध्ये शांतता होती.दुपारी शांतताउन्हाचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे. दुपारी एक ते चार या वेळेत ग्राहकांचे प्रमाण अल्प असल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले. ते म्हणाले, सकाळी दहा ते दुपारी एक आणि दुपारी साडेचार ते रात्री नऊ या वेळेत ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. तापमान कमीची आशागेल्या आठवड्यात कोल्हापुरातील तापमान ३२ ते ३९ सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. हिमालयातून येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली, तरच तापमान काहीसे कमी होण्याची आशा आहे, असे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.