शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

शहर चकाचक; मात्र तिकटी खड्ड्यातच

By admin | Updated: June 9, 2015 01:17 IST

सव्वादोन कोटी रुपयांची गरज : शहरातील १५० हून अधिक रस्ते झाले चकाचक

संतोष पाटील -कोल्हापूर -कासवगतीची ठरलेली १०८ कोटी रुपयांची नगरोत्थान योजना आता पूर्णत्वाकडे जात आहे. तसेच इतर शासकीय निधीतून १५० हून अधिक लहान-मोठ्या रस्त्यांच्या बांधणी व दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील रस्ते चकचकीत झाल्याचे चित्र असले तरी दोनहून अधिक प्रभागांतून जाणारे शहरातील प्रमुख १२ रस्ते मात्र खड्ड्यांतच राहिले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने बिनकामाच्या असलेल्या या रस्त्यांसाठी निधी देण्यास नगरसेवक अनुत्सुक आहेत. या रस्त्यांसाठी २.१७ कोटी रुपयांच्या निधीची जोडणी करताना प्रशासनाच्या मात्र नाकीनऊ आले आहे.सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या नगरसेवक तसेच कथित सामाजिक कार्यकर्त्यांवर फौजदारी दाखल करण्याची तंबी प्रशासनाने दिली. सभागृहाने दर्जेदार रस्त्यांसाठी आणाभाका घेतल्या. प्रशासनाने अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाईचा इशारा दिला. रस्त्याच्या कामाबाबत ‘बार चार्ट’ तयार करून सर्वच संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष कामावर पाहणी करून, रस्त्यांच्या दर्जाबाबत तपासणी करून त्याप्रमाणे हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली. दर्जाबाबत हयगय झाल्यास संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईचे नियोजन केले. इतकी तयारी करूनही नियोजन, इशारे, उद्घाटनांचा ‘शो’ यांत अडकलेले शहरातील या रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू करून ‘नगरोत्थान’बरोबरच हे रस्तेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाने यशस्वी प्रयत्न केला. शहरातील रस्ते चकचकीत झाल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र प्रत्यक्षात दोनहून अधिक प्रभागांतून जाणाऱ्या रस्त्यांना डांबर लागले नाहीच. प्रभागातील लहानशा बोळात कॉँक्रीट किंवा पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी या प्रमुख रस्त्यांसाठी निधी देताना मात्र हात आखडता घेत आहेत. आमदार-खासदार निधीतून पैसे खर्ची घालताना मतदार व त्यांची संख्या नजरेसमोर धरली जाते. या रस्त्यांची मतदार व निवडणुकीच्या दृष्टीने नगरसेवकांना उपयोगिता नसल्यानेच यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.दोन-दोन प्रभागांतील सीमेवरील रस्ते तयार करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. लवकरच यासाठी विशेष निधीची तरतूद करून या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता