शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

शहर विकास आराखडा रखडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:41 IST

संतोष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराचा नवा तिसरा विकास आराखडा (डी.पी.) तयार करण्याचे काम मार्च २०१७ ...

संतोष पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहराचा नवा तिसरा विकास आराखडा (डी.पी.) तयार करण्याचे काम मार्च २०१७ पासून सुरू करूनही कागदावरच आहे. महापालिकेने खासगी संस्थेद्वारे विद्यमान भूवापर (ईएलयू) नकाशा तयार करण्यासाठी तीन वेळा निविदा काढूनही संस्थांनी पाठ फिरविली. त्यामुळे महापालिकेने ईएलयूनुसार आराखडा करण्याची विनंती शासनाला केली; पण गेले तीन महिने त्यांच्याकडून प्रतिसादच नाही. डी.पी. तयार होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने शहराचा विकास रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.शहराचा दुसरा विकास आराखडा २५ जानेवारी २००१ ला मंजूर होऊन १५ मार्च २००१ ला अमलात आला. याची मुदत मुदत ३१ जानेवारी २०२० ला संपत आहे. तत्पूर्वी ११ मार्च २०१६ ला शासनाने तिसऱ्या विकास आराखड्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. खासगी संस्थेद्वारे डीपी तयार करण्याची निविदा काढली. तीन वेळा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१९ ला प्रस्तावित भूवापर नकाशा (पीएलयू) तयार करण्यासाठी विशेष घटकाची (डी. पी. युनिट)ची स्थापना करण्याची विनंती शासनाकडे केली. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद नाही.सन १९५१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली, त्यावेळी शहराची असणारी ६६.८२ चौरस किलोमीटरची हद्द आजही कायम आहे. त्यामुळे शहराच्या आडव्या वाढीला मर्यादा आल्या. १८९७ साली मिरज-कोल्हापूर रेल्वेलाईन व १९२७ साली जयंती नाल्यावर बांधलेल्या विल्सन पुलामुळे शहराचा विस्तार होण्यास उपयोग झाला. लक्ष्मीपुरी व शाहूपुरीचा विकास होऊन शहर जुन्या गावठाणातून बाहेर पडले. यानंतर १९२९ मध्ये राजारामपुरी वसाहत व १९४० साली ताराबाई पार्क येथे २० गुंठ्यांच्या प्लॉटद्वारे उच्चभ्रू वस्तींची वाढ झाली. यानंतर ६०-७०च्या दशकात रुईकर कॉलनीची निर्मिती, तर ३६० हेक्टरमध्ये विस्तारलेले शिवाजी विद्यापीठ व त्यालगतचा परिसर यांचा विकास होऊन आताचे शहर आकाराला आले. यानंतर नियोजनबद्ध विकास रखडला. किमान शहराची पुढील २० वर्षांची वाटचाल करणारा विकास आराखडा कागदावरच राहिला. त्यामुळे शहराची वाढ खुंटली. तिसºया विकास आराखड्याच्याबाबतीतही हाच अनुभव येत असल्याने शहर विकासाबाबतची महापालिका व राज्य शासनाची उदासीनता समोर आली आहे.दुसºया ‘डी.पी.’तील चार टक्केच विकासशहरात दवाखान्यासाठी २१ पैकी केवळ पाच जागांचा वापर झाला. मार्केटसाठी आरक्षित ३० पैकी फक्त १३ जागांचा विकास झाला. वाचनालयासाठी आरक्षित १४ पैकी फक्त पाच जागांवर वाचनालये उभी झाली. खुल्या जागा, बगीचे व मैदाने व आयलॅँडसाठी आरक्षित १२९ जागांपैकी फक्त १८ जागांचा विकास झाला. या जागांचे क्षेत्रफळ ११७ हेक्टर असून, यापैकी फक्त २.१९ हेक्टरच्याच जागा वापरात आल्या. माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी ४१ पैकी १८ जागांवर शाळा उभ्या झाल्या. म्युनिसिपल उद्देशासाठी १९ पैकी १३ जागांचा विकास करण्यात महापालिकेला यश आले. शासकीय व निमशासकीय कारणांसाठी आरक्षित २० पैकी १३ जागा पडून आहेत. इतर जागा ग्रीन पार्क, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, प्लेइंग ग्रीन गार्डन, केएमटी वर्कशॉप, आदींसाठी आरक्षित आहेत. रेड झोनमधील बांधकामांच्या प्रतीक्षेत अनेक जागा आहेत. महापालिकेने फक्त ५७ जागांवर मिळकत पत्रकांवर नाव नोंदविले आहे.विकास आराखड्याची गरज काय ?शहराच्या विकासाचा वेध घेऊन पायाभूत सुविधांची मांडणी करण्यासाठी शहर विकास आराखडा महत्त्वाचा घटक आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा घेऊन जमीन वापरावर नियंत्रण, जागा आरक्षित करून त्याचा विविध सार्वजनिक वापरासाठी वापर निश्चित केला जातो.