शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

शहर विकास आराखडा रखडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:41 IST

संतोष पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराचा नवा तिसरा विकास आराखडा (डी.पी.) तयार करण्याचे काम मार्च २०१७ ...

संतोष पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शहराचा नवा तिसरा विकास आराखडा (डी.पी.) तयार करण्याचे काम मार्च २०१७ पासून सुरू करूनही कागदावरच आहे. महापालिकेने खासगी संस्थेद्वारे विद्यमान भूवापर (ईएलयू) नकाशा तयार करण्यासाठी तीन वेळा निविदा काढूनही संस्थांनी पाठ फिरविली. त्यामुळे महापालिकेने ईएलयूनुसार आराखडा करण्याची विनंती शासनाला केली; पण गेले तीन महिने त्यांच्याकडून प्रतिसादच नाही. डी.पी. तयार होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने शहराचा विकास रखडण्याची भीती व्यक्त होत आहे.शहराचा दुसरा विकास आराखडा २५ जानेवारी २००१ ला मंजूर होऊन १५ मार्च २००१ ला अमलात आला. याची मुदत मुदत ३१ जानेवारी २०२० ला संपत आहे. तत्पूर्वी ११ मार्च २०१६ ला शासनाने तिसऱ्या विकास आराखड्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. खासगी संस्थेद्वारे डीपी तयार करण्याची निविदा काढली. तीन वेळा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर २१ फेब्रुवारी २०१९ ला प्रस्तावित भूवापर नकाशा (पीएलयू) तयार करण्यासाठी विशेष घटकाची (डी. पी. युनिट)ची स्थापना करण्याची विनंती शासनाकडे केली. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप कोणताच प्रतिसाद नाही.सन १९५१ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली, त्यावेळी शहराची असणारी ६६.८२ चौरस किलोमीटरची हद्द आजही कायम आहे. त्यामुळे शहराच्या आडव्या वाढीला मर्यादा आल्या. १८९७ साली मिरज-कोल्हापूर रेल्वेलाईन व १९२७ साली जयंती नाल्यावर बांधलेल्या विल्सन पुलामुळे शहराचा विस्तार होण्यास उपयोग झाला. लक्ष्मीपुरी व शाहूपुरीचा विकास होऊन शहर जुन्या गावठाणातून बाहेर पडले. यानंतर १९२९ मध्ये राजारामपुरी वसाहत व १९४० साली ताराबाई पार्क येथे २० गुंठ्यांच्या प्लॉटद्वारे उच्चभ्रू वस्तींची वाढ झाली. यानंतर ६०-७०च्या दशकात रुईकर कॉलनीची निर्मिती, तर ३६० हेक्टरमध्ये विस्तारलेले शिवाजी विद्यापीठ व त्यालगतचा परिसर यांचा विकास होऊन आताचे शहर आकाराला आले. यानंतर नियोजनबद्ध विकास रखडला. किमान शहराची पुढील २० वर्षांची वाटचाल करणारा विकास आराखडा कागदावरच राहिला. त्यामुळे शहराची वाढ खुंटली. तिसºया विकास आराखड्याच्याबाबतीतही हाच अनुभव येत असल्याने शहर विकासाबाबतची महापालिका व राज्य शासनाची उदासीनता समोर आली आहे.दुसºया ‘डी.पी.’तील चार टक्केच विकासशहरात दवाखान्यासाठी २१ पैकी केवळ पाच जागांचा वापर झाला. मार्केटसाठी आरक्षित ३० पैकी फक्त १३ जागांचा विकास झाला. वाचनालयासाठी आरक्षित १४ पैकी फक्त पाच जागांवर वाचनालये उभी झाली. खुल्या जागा, बगीचे व मैदाने व आयलॅँडसाठी आरक्षित १२९ जागांपैकी फक्त १८ जागांचा विकास झाला. या जागांचे क्षेत्रफळ ११७ हेक्टर असून, यापैकी फक्त २.१९ हेक्टरच्याच जागा वापरात आल्या. माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी ४१ पैकी १८ जागांवर शाळा उभ्या झाल्या. म्युनिसिपल उद्देशासाठी १९ पैकी १३ जागांचा विकास करण्यात महापालिकेला यश आले. शासकीय व निमशासकीय कारणांसाठी आरक्षित २० पैकी १३ जागा पडून आहेत. इतर जागा ग्रीन पार्क, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, प्लेइंग ग्रीन गार्डन, केएमटी वर्कशॉप, आदींसाठी आरक्षित आहेत. रेड झोनमधील बांधकामांच्या प्रतीक्षेत अनेक जागा आहेत. महापालिकेने फक्त ५७ जागांवर मिळकत पत्रकांवर नाव नोंदविले आहे.विकास आराखड्याची गरज काय ?शहराच्या विकासाचा वेध घेऊन पायाभूत सुविधांची मांडणी करण्यासाठी शहर विकास आराखडा महत्त्वाचा घटक आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा आढावा घेऊन जमीन वापरावर नियंत्रण, जागा आरक्षित करून त्याचा विविध सार्वजनिक वापरासाठी वापर निश्चित केला जातो.