शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

एजन्सी न नेमल्यामुळे शहर विकास आराखडा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूर : ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं’ म्हणतात तशी अवस्था नियोजित तिसऱ्या सुधारित शहर विकास आराखड्याची झाली आहे. हा ...

कोल्हापूर : ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्नं’ म्हणतात तशी अवस्था नियोजित तिसऱ्या सुधारित शहर विकास आराखड्याची झाली आहे. हा विकास आराखडा २०२० अखेरीस अंतिम मंजुरीसह तयार होणे अपेक्षित होते, परंतु प्रशासकीय ढिलाई, कोरोनाची साथ, निविदा प्रक्रियेतील बाह्यशक्तींचा हस्तक्षेप यामुळे आराखड्याचे काम सध्या रखडले आहे.

राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रत्येक वीस वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार करत असते. महानगरपालिकेचा दुसरा सुधारित विकास आराखडा २०२० मध्ये मंजूर झाला. त्याला आता वीस वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आता तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करणे बंधनकारक आहे. वास्तविक या आराखड्याची पूर्वतयारी २०१९ पासून सुरू होणे अपेक्षित होते. परंतु महापूर, प्रशासकीय दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींचा निरुत्साह आणि गेल्या पंधरा महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा संसर्ग अशा विविध कारणांनी या आराखड्याचे काम रखडले आहे.

एक वर्षापूर्वी राज्य सरकारने विकास आराखड्याच्या कामाकरिता आवश्यक तो कर्मचारी वर्ग महानगरपालिकेला उपलब्ध करून दिला. एक नगर रचना उपसंचालक, नगर रचनाकार, सहायक नगर रचनाकार, रचनाकार सहायक, सर्व्हेअर, ट्रेसर, शिपाई असे अधिकारी व कर्मचारी सध्या राजारामपुरीतील जनता बझारच्या इमारतीत असलेल्या कार्यालयात बसून आराखड्याचे काम करत आहेत. परंतु नवीन आराखडा करण्याकरिता तज्ज्ञ एजन्सी नेमायची आहे, त्याची निविदा प्रक्रियाच ठप्प आहे.

एजन्सी न नेमल्यामुळे आराखडा तयार करण्याच्या कामात अडचणी आलेल्या आहेत. निविदा कोणाला द्यावी, यावर काही बाह्यशक्तींचा हस्तक्षेप असल्यामुळे एजन्सी नेमलेली नाही. एकूण पाच जणांनी निविदा भरलेल्या आहेत, त्यातील तीन निविदा एकाच एजन्सीच्या आहेत. दोन एजन्सींच्या निविदा अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. ज्यांच्या निविदा अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी त्याची कारणे महापालिकेला विचारली आहेत, पण ते देता आलेले नाही. त्यामुळे एजन्सी निश्चित झालेली नाही.

- २ कोटी ६६ लाख पगारावर खर्च -

महापालिकेने ज्या गतीने विकास आराखड्याचे काम करण्याकरिता अधिकारी, कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेतले, तेवढ्या गतीने काम होत नाही. सध्या विद्यमान भूमापन नकाशा तयार करण्यात येत आहे. तसेच सांख्यिकी विभागाकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. कामाचा स्तर हा पूर्व प्राथमिक स्वरूपाचा आहे. गेल्या काही महिन्यांत दोन कोटी ६६ लाख रुपये फक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च झाले आहेत, पण कामाला सुरुवात नाही.

कोट -

आराखड्याच्या कामासाठी एजन्सी नेमून सॅटेलाइटद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुढील कोणतेच काम होणार नाही. जागेवरील परिस्थितीनुसार नकाशा तयार झाल्यावरच आराखड्यातील रस्ते, सुविधा क्षेत्र यासह अंतिम रेखांकन होणार आहे. एजन्सी नेमल्यानंतरच या कामाला गती येणार आहे.

धनंजय खोत, उपसंचालक