शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी हातकणंगले शहरातील नागरिकांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

हातकणंगले-इचलकरंजी मार्गालगत असलेल्या गावतलावामध्ये शहरातील गटारीचे आणि पावसाचे दूषित पाणी एकत्र जमा होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या गावतलावामध्ये ...

हातकणंगले-इचलकरंजी मार्गालगत असलेल्या गावतलावामध्ये शहरातील गटारीचे आणि पावसाचे दूषित पाणी एकत्र जमा होते. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे या गावतलावामध्ये दूषित पाण्याने दुर्गंधी पसरते. पावसाळ्यात या तलावाभोवती असणाऱ्या रहिवाशांच्या घरांत हे दूषित पाणी शिरते. शहराच्या पूर्वेकडील श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि शेतामध्ये हे दूषित पाणी जाऊन परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. गावतलावाचे दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये साचून राहिल्याने शेती नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हातकणंगले गावतलावाचे पाणी शाहूकालीन मोरीतून हातकणंगले शहराच्या पश्चिमेकडील ओढ्याला सोडण्यात आले होते. मात्र शहरातून इचलकरंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने भराव टाकल्यामुळे ही शाहूकालीन मोरी पूर्णपणे बंद झाली आहे. दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गेली १० वर्षे तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनादिवशीच उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनावर सुभाष चव्हाण, रमेश स्वामी, बापूसाहेब ठोंबरे, विलास नर्मदे, बापूसो ठोंबरे, सुरेश बागे, मोहन नर्मदे, प्रकाश मोरे, सदाशिव भेंडवडे यांच्या सह्या आहेत.