शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

‘अत्यावश्यक’चा गैरवापर करत नागरिक सुसाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न ...

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क हनुवटीला आणि रस्त्यांवर वर्दळ असे शहरातील एकूण चित्र होेते.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी येऊन कोरोनाची साखळी तुटावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, शहरातील एकूण चित्र पाहता या उद्देशालाच हरताळ फासत कोल्हापूरकर सुसाट फिरत आहेत. शासनाने अत्यावश्यक या कारणासाठी दिलेली सूट पुरेपूर वापरात आणत कोणत्याही नियमांचे पालन करणे आपल्याला बंधनकारक नाहीच, अशीच एकूण वर्तणूक होती. शासनाने संचारबंदीमध्ये अत्यावश्यक या नावाखाली मोजके व्यवसाय वगळता जवळपास सर्वच व्यवसाय व दुकानांना परवानगी दिली आहे. एकाच ओळीतील चार दुकाने सुरू तर दोन दुकाने बंद असे बाजारपेठेचे चित्र आहे.

--

अत्यावश्यक म्हणजे नेमके काय?

लोक वाट्टेल ती कारणे सांगून गावभर फिरत आहेत. त्यापैकी किती लोकांची कारणे ही खरेच अत्यावश्यकमध्ये मोडतात, ही कामे ते टाळू शकत होते का, याची तपासणी केली तर त्यातील फोलपणा जाणवेल. त्यामुळे अत्यावश्यकमधील सूट कमी करणे गरजेचे आहे.

---

कुठे आहे सोशल डिस्टन्सिंग?

शुक्रवारी दुपारी शाहूपुरी, राजारामपुरी, बिंदू, चौक, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, साइक्स एक्सटेंशन, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, उद्यमनगर, दसरा चौक या परिसरातील चित्र पाहिले असता एकाही दुकानात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होता. मास्क केवळ हनुवटीच्या सुरक्षेसाठी लावला होता. नाक आणि तोंड उघडेच होते. काही जणांनी तेदेखील लावण्याची तसदी घेतलेली नव्हती. ग्राहक खेटून दुकानांमध्ये व बाहेर उभे होते.

----

बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर वेटिंग

मध्यवर्ती बसस्थानकात बऱ्यापैकी प्रवाशांची गर्दी होती. एरव्हीपेक्षा कमी प्रमाणत एसटीच्या फेऱ्या सुरू असल्या तरी एसटी भरेपर्यंत वाट पाहून गाड्या सोडल्या जात होत्या. तर रेल्वे स्थानकावर परराज्यातील मजूर बसून होते.

---

आम्ही काय पाप केलंय?

अन्य व्यवसाय करत असलेल्या एखाद्या दुकानात अत्यावश्यक सेवेतील वस्तू किंवा खाद्यपदार्थदेखील मिळत असेल तर ती दुकाने सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर नसलेली बरीच दुकाने अर्धवट शटर उघडी ठेवून सुरू होती. केवळ कपड्यांची दुकाने, शोभेच्या वस्तूंची, ज्वेलरी, प्लास्टिकसह अन्य प्रकारच्या साहित्यांची विक्री करणारी अशी अगदीच वेगळा व्यवसाय करणारी ४० टक्के दुकाने बंद होती. एवढे सगळे सुरू ठेवायचेच होते तर आम्ही काय पाप केले होते, अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.

---

कारवाईत शिथिलता

एवढ्या मोठ्या संख्येने शहरात नागरिक फिरत असताना पोलिसांनीही कारवाईत शिथिलता आणावी लागली. विनाकारण फिरणारे लोकही अत्यावश्यकमधील अशी कारणे सांगायचे की त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही. आम्ही किती म्हणून आणि काय म्हणून रोखणार, अशी त्यांची अडचण होती. अनेक लोक तर महापालिका कर्मचारी किंवा ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी मारली तरी थांबवायचा प्रयत्न केला तरी सुसाट गाडी पळवत होते.

---

फोटो फाइल स्वतंत्र