शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

‘अत्यावश्यक’चा गैरवापर करत नागरिक सुसाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न ...

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क हनुवटीला आणि रस्त्यांवर वर्दळ असे शहरातील एकूण चित्र होेते.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी येऊन कोरोनाची साखळी तुटावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, शहरातील एकूण चित्र पाहता या उद्देशालाच हरताळ फासत कोल्हापूरकर सुसाट फिरत आहेत. शासनाने अत्यावश्यक या कारणासाठी दिलेली सूट पुरेपूर वापरात आणत कोणत्याही नियमांचे पालन करणे आपल्याला बंधनकारक नाहीच, अशीच एकूण वर्तणूक होती. शासनाने संचारबंदीमध्ये अत्यावश्यक या नावाखाली मोजके व्यवसाय वगळता जवळपास सर्वच व्यवसाय व दुकानांना परवानगी दिली आहे. एकाच ओळीतील चार दुकाने सुरू तर दोन दुकाने बंद असे बाजारपेठेचे चित्र आहे.

--

अत्यावश्यक म्हणजे नेमके काय?

लोक वाट्टेल ती कारणे सांगून गावभर फिरत आहेत. त्यापैकी किती लोकांची कारणे ही खरेच अत्यावश्यकमध्ये मोडतात, ही कामे ते टाळू शकत होते का, याची तपासणी केली तर त्यातील फोलपणा जाणवेल. त्यामुळे अत्यावश्यकमधील सूट कमी करणे गरजेचे आहे.

---

कुठे आहे सोशल डिस्टन्सिंग?

शुक्रवारी दुपारी शाहूपुरी, राजारामपुरी, बिंदू, चौक, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, साइक्स एक्सटेंशन, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, उद्यमनगर, दसरा चौक या परिसरातील चित्र पाहिले असता एकाही दुकानात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होता. मास्क केवळ हनुवटीच्या सुरक्षेसाठी लावला होता. नाक आणि तोंड उघडेच होते. काही जणांनी तेदेखील लावण्याची तसदी घेतलेली नव्हती. ग्राहक खेटून दुकानांमध्ये व बाहेर उभे होते.

----

बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर वेटिंग

मध्यवर्ती बसस्थानकात बऱ्यापैकी प्रवाशांची गर्दी होती. एरव्हीपेक्षा कमी प्रमाणत एसटीच्या फेऱ्या सुरू असल्या तरी एसटी भरेपर्यंत वाट पाहून गाड्या सोडल्या जात होत्या. तर रेल्वे स्थानकावर परराज्यातील मजूर बसून होते.

---

आम्ही काय पाप केलंय?

अन्य व्यवसाय करत असलेल्या एखाद्या दुकानात अत्यावश्यक सेवेतील वस्तू किंवा खाद्यपदार्थदेखील मिळत असेल तर ती दुकाने सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर नसलेली बरीच दुकाने अर्धवट शटर उघडी ठेवून सुरू होती. केवळ कपड्यांची दुकाने, शोभेच्या वस्तूंची, ज्वेलरी, प्लास्टिकसह अन्य प्रकारच्या साहित्यांची विक्री करणारी अशी अगदीच वेगळा व्यवसाय करणारी ४० टक्के दुकाने बंद होती. एवढे सगळे सुरू ठेवायचेच होते तर आम्ही काय पाप केले होते, अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.

---

कारवाईत शिथिलता

एवढ्या मोठ्या संख्येने शहरात नागरिक फिरत असताना पोलिसांनीही कारवाईत शिथिलता आणावी लागली. विनाकारण फिरणारे लोकही अत्यावश्यकमधील अशी कारणे सांगायचे की त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही. आम्ही किती म्हणून आणि काय म्हणून रोखणार, अशी त्यांची अडचण होती. अनेक लोक तर महापालिका कर्मचारी किंवा ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी मारली तरी थांबवायचा प्रयत्न केला तरी सुसाट गाडी पळवत होते.

---

फोटो फाइल स्वतंत्र