शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘अत्यावश्यक’चा गैरवापर करत नागरिक सुसाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न ...

कोल्हापूर : अत्यावश्यक या कारणाचा गैरवापर करत गुरुवारी संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरकर दिवसभर रस्त्यावर सुसाट होते. पोलिसांनाही न जुमानता त्यांना चुकवून जाणारी वाहने, दुकानांमध्ये खेटून उभे राहिलेेले ग्राहक, बँकांबाहेर उडालेला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्क हनुवटीला आणि रस्त्यांवर वर्दळ असे शहरातील एकूण चित्र होेते.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क कमी येऊन कोरोनाची साखळी तुटावी हा त्या मागचा उद्देश होता. मात्र, शहरातील एकूण चित्र पाहता या उद्देशालाच हरताळ फासत कोल्हापूरकर सुसाट फिरत आहेत. शासनाने अत्यावश्यक या कारणासाठी दिलेली सूट पुरेपूर वापरात आणत कोणत्याही नियमांचे पालन करणे आपल्याला बंधनकारक नाहीच, अशीच एकूण वर्तणूक होती. शासनाने संचारबंदीमध्ये अत्यावश्यक या नावाखाली मोजके व्यवसाय वगळता जवळपास सर्वच व्यवसाय व दुकानांना परवानगी दिली आहे. एकाच ओळीतील चार दुकाने सुरू तर दोन दुकाने बंद असे बाजारपेठेचे चित्र आहे.

--

अत्यावश्यक म्हणजे नेमके काय?

लोक वाट्टेल ती कारणे सांगून गावभर फिरत आहेत. त्यापैकी किती लोकांची कारणे ही खरेच अत्यावश्यकमध्ये मोडतात, ही कामे ते टाळू शकत होते का, याची तपासणी केली तर त्यातील फोलपणा जाणवेल. त्यामुळे अत्यावश्यकमधील सूट कमी करणे गरजेचे आहे.

---

कुठे आहे सोशल डिस्टन्सिंग?

शुक्रवारी दुपारी शाहूपुरी, राजारामपुरी, बिंदू, चौक, लक्ष्मीपुरी बाजारपेठ, साइक्स एक्सटेंशन, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, उद्यमनगर, दसरा चौक या परिसरातील चित्र पाहिले असता एकाही दुकानात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. बँकांबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होता. मास्क केवळ हनुवटीच्या सुरक्षेसाठी लावला होता. नाक आणि तोंड उघडेच होते. काही जणांनी तेदेखील लावण्याची तसदी घेतलेली नव्हती. ग्राहक खेटून दुकानांमध्ये व बाहेर उभे होते.

----

बसस्थानक, रेल्वेस्टेशनवर वेटिंग

मध्यवर्ती बसस्थानकात बऱ्यापैकी प्रवाशांची गर्दी होती. एरव्हीपेक्षा कमी प्रमाणत एसटीच्या फेऱ्या सुरू असल्या तरी एसटी भरेपर्यंत वाट पाहून गाड्या सोडल्या जात होत्या. तर रेल्वे स्थानकावर परराज्यातील मजूर बसून होते.

---

आम्ही काय पाप केलंय?

अन्य व्यवसाय करत असलेल्या एखाद्या दुकानात अत्यावश्यक सेवेतील वस्तू किंवा खाद्यपदार्थदेखील मिळत असेल तर ती दुकाने सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर नसलेली बरीच दुकाने अर्धवट शटर उघडी ठेवून सुरू होती. केवळ कपड्यांची दुकाने, शोभेच्या वस्तूंची, ज्वेलरी, प्लास्टिकसह अन्य प्रकारच्या साहित्यांची विक्री करणारी अशी अगदीच वेगळा व्यवसाय करणारी ४० टक्के दुकाने बंद होती. एवढे सगळे सुरू ठेवायचेच होते तर आम्ही काय पाप केले होते, अशी प्रतिक्रिया एका व्यावसायिकाने दिली.

---

कारवाईत शिथिलता

एवढ्या मोठ्या संख्येने शहरात नागरिक फिरत असताना पोलिसांनीही कारवाईत शिथिलता आणावी लागली. विनाकारण फिरणारे लोकही अत्यावश्यकमधील अशी कारणे सांगायचे की त्यांच्यावर कारवाईही करता येत नाही. आम्ही किती म्हणून आणि काय म्हणून रोखणार, अशी त्यांची अडचण होती. अनेक लोक तर महापालिका कर्मचारी किंवा ट्रॅफिक पोलिसांनी शिट्टी मारली तरी थांबवायचा प्रयत्न केला तरी सुसाट गाडी पळवत होते.

---

फोटो फाइल स्वतंत्र