शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागरिकांशी गैरवर्तन; सहा पोलिसांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:45 IST

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाºया सामान्य नागरिकाला चांगली वागणूक न देता त्यांच्याशी उद्धट भाषा वापरल्याप्रकरणी सहा पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली आहे. यापुढे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचाºयांकडून नागरिकांना सन्मानाची वागणूक न मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाºयांना दिला.पोलीस ...

कोल्हापूर : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाºया सामान्य नागरिकाला चांगली वागणूक न देता त्यांच्याशी उद्धट भाषा वापरल्याप्रकरणी सहा पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविली आहे. यापुढे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व कर्मचाºयांकडून नागरिकांना सन्मानाची वागणूक न मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाºयांना दिला.पोलीस मुख्यालयात शुक्रवारी क्राईम बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामकाजांचा लेखा-जोखा मांडण्यात आला. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यानुसार मोहिते यांनी अधिकाºयांना चांगलेच सुनावले. ‘तक्रार कसलीही असो व व्यक्ती कोणीही असो त्याला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे. त्यांच्या तक्रारीची दखल घेतली पाहिजे. पोलीस ही लोकांसाठी अस्तित्वात आलेली यंत्रणा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या पातळीवरच तक्रारींची गांभीर्याने दखल घेतल्यास अनेक प्रश्न निकाली निघू शकतात. सामान्यातील सामान्य माणसाला, वृद्ध, महिला, लहान मुले, अल्पसंख्याक, दलित, ज्यांना आवाज नाही त्यांचा पोलीसच आवाज बनतील. त्यांना न्याय मिळवून देणे हे पोलीस म्हणून आमचे कर्तव्य आहे. चोरी, घरफोडी, भांडण या कारणास्तव मानसिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना मनस्ताप नको असतो. त्यामुळे ते पोलिसांत तक्रार करण्यास टाळाटाळ करतात किंवा वरिष्ठ अधिकाºयांकडे धाव घेतात. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाण्यात येणाºया नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. गेल्या सहा महिन्यांत नागरिकांच्या तक्रारी न घेता त्यांना माघारी पाठविल्याच्या काही तक्रारी दाखल झाल्याने सहा पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावली आहे. यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, अशा सूचना दिल्या. मोहिते यांच्या या निर्णयामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.पोलिसांवरील विश्वास उडालामध्यंतरी सांगली पोलिसांनी अनिकेत कोथळे याचा खून करून मृतदेह आंबोली घाटात जाळला. या घटनेने राज्यभर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. या घटनेनंतर अनेक नागरिकांनी पोलीस ठाण्यात अधिकारी किंवा ठाणे अंमलदाराकडून व्यवस्थित बोलले जात नाही. तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. काही वेळा आरोपींना पाठीशी घातले जाते. त्यामुळे आमचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. आम्हाला न्याय मागण्यासाठी तुमच्यापर्यंत यावे लागते, ही खेदाची बाब आहे; अशा संतप्त भावना काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक मोहिते यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी तक्रार दाखल करण्यास आलेल्या नागरिकाची तक्रार का घेतली नाही, याचे कारण आठ दिवसांत द्यावे, अशी नोटीस बजावली आहे.