शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

सर्किट बेंचचे पत्र दोन वर्षे उच्च न्यायालयातच पडून, शिफारशीची गरज : आता राजकीय इच्छाशक्तीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे यासाठी राज्य शासनाने केलेल्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारे राज्य शासनाचे पत्र गेली ...

कोल्हापूर : कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे यासाठी राज्य शासनाने केलेल्या शिफारशींचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारे राज्य शासनाचे पत्र गेली दोन वर्षे उच्च न्यायालयातच पडून असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य शासनाच्या वतीने खासदार संभाजीराजे यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न लोंबकळत राहिला आहे. न्यायालयीन भाषेत हा पश्न तारीख पे तारीख अशा घोळात अडकला आहे. आता नव्या सरकारच्या मागे लागून तातडीने मुख्य न्यायाधीशांकडून कशी शिफारस होईल यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

राज्यात उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यापूर्वी राज्य पुनर्रचना अधिनियम १९५६ च्या कलम ५१ (२) नुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सहमती आवश्यक असते. सर्वोच्च न्यायालय खंडपीठ मंजुरीस विलंब लावते, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास बराच अवधी लागू शकतो, ही बाब लक्षात आल्यानंतर राज्यात भाजप-शिवसेेनेचे सरकार सत्तेत असताना राज्य मंत्रिमंडळाने कोल्हापूरला सर्किट बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरची लोकसंख्या, मुंबईपासूनचे अंतर, प्रलंबित खटल्यांची संख्या विचारात घेऊन सर्किट बेंच स्थापन करण्यास सहमती देण्याची शिफारस शासनाच्या वतीने १७ जुलै २०१५ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना करण्यात आली; परंतु त्याचवेळी पुण्यातूनही खंडपीठ स्थापन करण्याची मागणी झाली. मागच्या सरकारमध्ये पुण्यातील सर्व आमदार भाजपचे होते. तत्कालीन मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रिमंडळात हा विषय फारच ताणून धरला. त्यामुळे राज्य सरकारने या शिफारसपत्राच्या खाली कोल्हापूरसोबत पुण्याचाही खंडपीठासाठी विचार व्हावा, अशी एक ओळ जोडली. दोन प्रमुख शहरांतून मागणी आल्याने मुख्य न्यायाधीशांनाही निर्णय घेण्यास अडचण झाली. त्यामुळे कुणाचीच शिफारसच होऊ शकली नाही. त्यानंतर कोल्हापूरकरांनी पुन्हा आंदोलन केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने फक्त कोल्हापूरचा उल्लेख करून राज्य सरकार शिफारस करण्यासंबंधीचे पत्र मुख्य न्यायाधीशांना पाठवेल, असे आश्वासन दिले. त्यानुसार राज्य शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ ला तसे पत्र पाठविले; परंतु त्यानंतरही मुख्य न्यायाधीशांकडून ही शिफारस झाली नाही, म्हणून राज्य सरकारने तातडीने बैठक बोलाविण्याची विनंती १९ जानेवारी २०१९ ला पत्र पाठवून मुख्य न्यायाधीशांकडे केली. पुन्हा १९ मार्च २०२० ला पत्र पाठवून स्मरणही करण्यात आले; परंतु बैठकही नाही व शिफारसही नाही, अशा स्थितीत हा प्रश्न लोंबकळत आहे.

नव्याने रणशिंग..

कोल्हापूर बार असोसिएशनने गेल्याच आठवड्यात बैठक घेतली. त्यामध्ये मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांची भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे वर्षभर या प्रश्नावर काहीच हालचाल झालेली नाही.