शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

माणसे जोडण्याचे सिनेमा प्रभावी माध्यम!

By admin | Updated: November 21, 2014 02:23 IST

विभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा

सद्गुरू पाटील, पणजीविभिन्न भाषा व संस्कृतीचे लोक सिनेमामुळे एकत्र येतात. सिनेमा एक प्रकारे माणसे जोडण्याचेच प्रभावी माध्यम आहे. चित्रपट उद्योगातील लोकांनी हा वारसा असाच पुढे चालवावा, असे आवाहन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी केले. ४५व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी दोनापावल येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन झाले.गोव्यासंबंधीच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ म्हणाले, माझा गोव्याशी खूपच जुना संबंध आहे. माझ्या पहिल्यावहिल्या ‘सात हिंदुस्तानी’ यासह अनेक सिनेमांचे चित्रीकरणही गोव्यातच झाले. गोव्यातील प्रेमळ माणसे, बहुविध संस्कृती, देखणे सागरकिनारे, आल्हाददायी वातावरण मला भावते, असे अमिताभ यांनी नम्रपणे नमूद केले. गोव्याला ‘इफ्फी’चे कायमस्वरूपी केंद्र बनविल्याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. सिनेसृष्टीतील आमच्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेतल्याशिवाय आम्ही नवा इतिहास निर्माण करू शकत नाही, असे सांगत त्यांनी वडील स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘कोशिश करनेवालों की हार नही होती,’ या कवितेच्या काही पंक्ती उद्धृत केल्या. सिनेसृष्टीतील योगदानाबाबत दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांना अमिताभ आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते ‘सेंटेनरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गोव्यात आपण ‘इफ्फी’साठी पहिल्यांदाच आलो. पुरस्काराबद्दल रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला. ‘इफ्फी’त दरवर्षी नवनव्या सुविधा निर्माण होतील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला. पुढील ‘इफ्फी’त आणखी सुविधा पुरवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.