शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘चौंडेश्वरी’च्या निवडणूक वादात घरावर दगडफेक

By admin | Updated: May 4, 2015 00:56 IST

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार

इचलकरंजी : येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीच्या मतदानावेळी गैरसमजातून शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान अंगावर धावून जाणे व धक्काबुक्कीमध्ये झाले. या संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दुपारी अडीच वाजता झालेल्या या घटनेचे पडसाद षटकोन चौकातील एका घरावर दगडफेक होण्यामध्ये झाले. तेथील एक मोटारसायकल व एक स्कूटी यांची मोडतोड करण्यात आली. चौंडेश्वरी सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये दोन गटांत सरळ लढत होत असल्याने कमालीची स्पर्धा होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच दोन गटांमध्ये परस्परांवर टीकाटिप्पणी चालू होती. तसेच दोन्ही गटांमध्ये उभे असलेल्या उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. दोन्ही गटांचे उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असल्याने चुरस निर्माण झाली होती. अशा वातावरणात रविवारी मतदान होत असताना दोन्ही बाजंूचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्राच्या ठिकाणी महिलांसह सुमारे दीड हजारजणांच्या जमावाने गर्दी केली होती. परिणामी केंद्रासमोरील रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या समर्थकांमध्ये रागाने बघितल्याच्या कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान दोन्ही बाजंूच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक उडून परस्परांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. या घटनेवेळी षटकोन चौकात राहणारे श्रीनिवास फाटक हे आक्रमक असल्याच्या कारणावरून ४०-५० जणांच्या एका गटाने त्यांच्या घरावर जाऊन दगडफेक केली. घरासमोर उभ्या केलेल्या मोटारसायकल (एमएच ०९ बीडी ३५००) व स्कूटी (एमएच ०९ बीएफ ३५००) यांच्यावर मोठे दगड घालून त्यांचे नुकसान केले. तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या दगडफेकीत त्यांच्या दोन मजली घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. अचानक हा प्रकार झाल्यामुळे घरातील सर्वजण भेदरून गेले. मात्र, आलेल्या जमावाने दगडफेक करून तेथून काढता पाय घेतला. फाटक यांच्या घरावर दगडफेक झाल्याचे मतदान केंद्रावर समजताच तेथेही तणाव निर्माण झाला होता. मात्र, एका लोकप्रतिनिधीचा दूरध्वनी फाटक यांचे समर्थक असलेल्या नेत्याच्या मोबाईलवर आला. त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून दगडफेकीत झालेले नुकसान भरून देण्यात येईल, असे सांगितले. त्याचा परिणाम म्हणून मतदान केंद्रावरील तणाव निवळला. पुढे सायंकाळी पाच वाजेपर्यंत शांततापूर्ण वातावरणात मतदान चालू राहिले. मात्र, मतदान संपल्यानंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडले. (प्रतिनिधी)