शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात साखरेने ओलांडली चाळिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 18:53 IST

कडधान्य, भाजीपाल्याचे दर स्थिर : फळबाजार अद्याप थंडच

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १६ : साखरेच्या दरात हळूहळू वाढ होत असून, या आठवड्यात साखरेने चाळिशी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४२ रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. कडधान्ये, भाजीपाल्याच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून मेथी, पालक, पोकळ्याचे दर मात्र स्थिर आहेत. फळबाजार अद्याप शांतच आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामापासून गेले सहा महिने घाऊक बाजारात साखरेचा दर ३३ ते ३६ प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही ३९ रुपयांपर्यंत साखर जाऊन थांबली; पण गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या आयातीवर बऱ्यापैकी निर्बंध येणार आहेत. त्याचा तत्काळ परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचा दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात साखर ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ४२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळातही सणांच्या पार्श्वभूमीवर आणखी दरात दोन-तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. तूरडाळ ७०, हरभराडाळ ७२ रुपये आहे. सरकी तेल ७०, तर शाबू ८० रुपयांवर कायम आहे. ‘जीएसटी’मुळे अजूनही व्यापारी गोंधळले असल्याने त्याचा थेट फटका कडधान्य बाजारावर दिसत आहे. एकूणच पावसाळा व जीएसटी यांमुळे कडधान्य बाजार शांत दिसत आहे. भाजीपाल्यामध्ये कोबी, वांगी, ढब्बूची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घेवडा व गवारीची आवक काहीशी मंदावल्याने दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक मर्यादित असल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात ७० रुपयांसून १२० रुपये किलोपर्यंत वाटाणा झाला. कारली, भेंडी, वरणा, दोडक्याची आवक स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी कांदापात, मेथी, पालक व पोकळा फारशी चढउतार दिसत नाही. फळ मार्केट अद्याप शांतच दिसत आहे. मोसंबी, संत्री, चिक्कंूची आवक मर्यादित आहे. पेरू व डाळिंबांची आवक चांगली आहे. ‘दशेरी’ आंबा तुरळक पाहावयास मिळत आहे. आणखी पंधरा दिवस श्रावण सुरू झाल्यानंतरच फळबाजाराला तेजी येण्यास लागणार आहे.

कांदा-बटाटा स्थिर!

बाजार समितीत आठवड्याला साधारणत: २५ हजार क्विंटल कांद्याची, तर १५ हजार क्विंटल बटाट्याची आवक होते. आवक व मागणी स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.