शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कोल्हापूरात साखरेने ओलांडली चाळिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2017 18:53 IST

कडधान्य, भाजीपाल्याचे दर स्थिर : फळबाजार अद्याप थंडच

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १६ : साखरेच्या दरात हळूहळू वाढ होत असून, या आठवड्यात साखरेने चाळिशी ओलांडली आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४२ रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. कडधान्ये, भाजीपाल्याच्या दरांत फारशी चढउतार दिसत नाही. कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली असून मेथी, पालक, पोकळ्याचे दर मात्र स्थिर आहेत. फळबाजार अद्याप शांतच आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामापासून गेले सहा महिने घाऊक बाजारात साखरेचा दर ३३ ते ३६ प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही ३९ रुपयांपर्यंत साखर जाऊन थांबली; पण गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने साखरेवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या आयातीवर बऱ्यापैकी निर्बंध येणार आहेत. त्याचा तत्काळ परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचा दिसून येत आहे. सध्या घाऊक बाजारात साखर ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ४२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळातही सणांच्या पार्श्वभूमीवर आणखी दरात दोन-तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कडधान्य बाजार तुलनेत स्थिर आहे. तूरडाळ ७०, हरभराडाळ ७२ रुपये आहे. सरकी तेल ७०, तर शाबू ८० रुपयांवर कायम आहे. ‘जीएसटी’मुळे अजूनही व्यापारी गोंधळले असल्याने त्याचा थेट फटका कडधान्य बाजारावर दिसत आहे. एकूणच पावसाळा व जीएसटी यांमुळे कडधान्य बाजार शांत दिसत आहे. भाजीपाल्यामध्ये कोबी, वांगी, ढब्बूची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घेवडा व गवारीची आवक काहीशी मंदावल्याने दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक मर्यादित असल्याने दर कडाडले आहेत. घाऊक बाजारात ७० रुपयांसून १२० रुपये किलोपर्यंत वाटाणा झाला. कारली, भेंडी, वरणा, दोडक्याची आवक स्थिर आहेत. कोथिंबिरीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी कांदापात, मेथी, पालक व पोकळा फारशी चढउतार दिसत नाही. फळ मार्केट अद्याप शांतच दिसत आहे. मोसंबी, संत्री, चिक्कंूची आवक मर्यादित आहे. पेरू व डाळिंबांची आवक चांगली आहे. ‘दशेरी’ आंबा तुरळक पाहावयास मिळत आहे. आणखी पंधरा दिवस श्रावण सुरू झाल्यानंतरच फळबाजाराला तेजी येण्यास लागणार आहे.

कांदा-बटाटा स्थिर!

बाजार समितीत आठवड्याला साधारणत: २५ हजार क्विंटल कांद्याची, तर १५ हजार क्विंटल बटाट्याची आवक होते. आवक व मागणी स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.