शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

By admin | Updated: January 21, 2016 00:28 IST

लोकमत इफेक्ट : तीन आमदारांचे अजूनही दुर्लक्ष

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’तून गावांची निवड करण्याचा विसर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दोन आमदारांना पडला, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये ८ जानेवारीला प्रसिद्ध झाली. तिची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी कसबा वाळवे (ता. राधानगरी), दारवाड (ता. भुदरगड) व हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) या तीन गावांची निवड केली आहे. दरम्यान, अजूनही आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील आणि नव्याने निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी गावांची निवड केलेली नाही. आमदार नरके आणि सत्यजित पाटील हे गावांची निवड करण्याबाबत का उदासीन आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. संबंधित अधिकारी गावांच्या निवडीसाठी पाठपुरावा करीत आहेत; पण आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. परिणामी निवडच न झाल्याने या दोन आमदारांच्या मतदारसंघात आमदार आदर्श ग्राम योजनेच्या कामांच्या प्रारंभाचा नारळही फुटलेला नाही. त्यामुळे नूतन आमदार सतेज पाटील यांच्यासह दोन आमदारांनीही त्वरित गावांची निवड करावी, अशी मागणी होत आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची या योजनेनुसार निवड करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा आणि विधान परिषद आमदाराने तीन गावांची निवड करावयाची आहे. टप्प्याटप्प्याने निवडलेली तीन गावे आदर्श करावयाची आहेत. हे तीन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदारांनी गावे निवडलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील जागृतीचे काम सुरू आहे.अशी आहे योजना सांसद आदर्श गाव योजना केंद्र शासनाने सुरू केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेचा ८ आॅक्टोबर २०१५ मध्ये अंमलबजावणी आदेश काढण्यात आला. लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, नैतिक मूल्यांचे पालन, नैसर्गिक मूल्यांचे जनत, आदी कामे योजनेतून करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून अन्य गावांसमोर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.