शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

By admin | Updated: January 21, 2016 00:28 IST

लोकमत इफेक्ट : तीन आमदारांचे अजूनही दुर्लक्ष

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’तून गावांची निवड करण्याचा विसर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दोन आमदारांना पडला, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये ८ जानेवारीला प्रसिद्ध झाली. तिची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी कसबा वाळवे (ता. राधानगरी), दारवाड (ता. भुदरगड) व हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) या तीन गावांची निवड केली आहे. दरम्यान, अजूनही आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील आणि नव्याने निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी गावांची निवड केलेली नाही. आमदार नरके आणि सत्यजित पाटील हे गावांची निवड करण्याबाबत का उदासीन आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. संबंधित अधिकारी गावांच्या निवडीसाठी पाठपुरावा करीत आहेत; पण आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. परिणामी निवडच न झाल्याने या दोन आमदारांच्या मतदारसंघात आमदार आदर्श ग्राम योजनेच्या कामांच्या प्रारंभाचा नारळही फुटलेला नाही. त्यामुळे नूतन आमदार सतेज पाटील यांच्यासह दोन आमदारांनीही त्वरित गावांची निवड करावी, अशी मागणी होत आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची या योजनेनुसार निवड करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा आणि विधान परिषद आमदाराने तीन गावांची निवड करावयाची आहे. टप्प्याटप्प्याने निवडलेली तीन गावे आदर्श करावयाची आहेत. हे तीन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदारांनी गावे निवडलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील जागृतीचे काम सुरू आहे.अशी आहे योजना सांसद आदर्श गाव योजना केंद्र शासनाने सुरू केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेचा ८ आॅक्टोबर २०१५ मध्ये अंमलबजावणी आदेश काढण्यात आला. लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, नैतिक मूल्यांचे पालन, नैसर्गिक मूल्यांचे जनत, आदी कामे योजनेतून करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून अन्य गावांसमोर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.