शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

पालकमंत्र्यांकडून ‘आमदार आदर्श’साठी तीन गावांची निवड

By admin | Updated: January 21, 2016 00:28 IST

लोकमत इफेक्ट : तीन आमदारांचे अजूनही दुर्लक्ष

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ‘आमदार आदर्श ग्राम योजने’तून गावांची निवड करण्याचा विसर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दोन आमदारांना पडला, अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये ८ जानेवारीला प्रसिद्ध झाली. तिची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी कसबा वाळवे (ता. राधानगरी), दारवाड (ता. भुदरगड) व हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) या तीन गावांची निवड केली आहे. दरम्यान, अजूनही आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील आणि नव्याने निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी गावांची निवड केलेली नाही. आमदार नरके आणि सत्यजित पाटील हे गावांची निवड करण्याबाबत का उदासीन आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. संबंधित अधिकारी गावांच्या निवडीसाठी पाठपुरावा करीत आहेत; पण आमदार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा येत आहेत. परिणामी निवडच न झाल्याने या दोन आमदारांच्या मतदारसंघात आमदार आदर्श ग्राम योजनेच्या कामांच्या प्रारंभाचा नारळही फुटलेला नाही. त्यामुळे नूतन आमदार सतेज पाटील यांच्यासह दोन आमदारांनीही त्वरित गावांची निवड करावी, अशी मागणी होत आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची या योजनेनुसार निवड करणे अपेक्षित आहे. प्रत्येक विधानसभा आणि विधान परिषद आमदाराने तीन गावांची निवड करावयाची आहे. टप्प्याटप्प्याने निवडलेली तीन गावे आदर्श करावयाची आहेत. हे तीन आमदार वगळता उर्वरित सर्व आमदारांनी गावे निवडलेली आहेत. पहिल्या टप्प्यातील जागृतीचे काम सुरू आहे.अशी आहे योजना सांसद आदर्श गाव योजना केंद्र शासनाने सुरू केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात आमदार आदर्श ग्राम योजनेचा ८ आॅक्टोबर २०१५ मध्ये अंमलबजावणी आदेश काढण्यात आला. लोकांचा सहभाग, स्त्री-पुरुष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, नैतिक मूल्यांचे पालन, नैसर्गिक मूल्यांचे जनत, आदी कामे योजनेतून करण्यात येणार आहेत. लोकसहभागातून अन्य गावांसमोर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.