शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘चित्री’चे पाणी ४२ टक्क्यांवर

By admin | Updated: March 25, 2016 23:35 IST

झपाट्याने पाणीपातळीत घट : मे महिन्यापासून पाणीप्रश्न गंभीर बनणार

आजरा : आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील पाण्याचा प्रमुख स्रोत असणाऱ्या चित्री प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, सद्य:स्थितीला पाणीसाठा केवळ ४२ टक्क्यांवर आल्याने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पाणीप्रश्न गंभीर बनणार असल्याचे स्पष्ट होत आहे.मुळातच यावर्षी चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. सांडव्यावरून पाणी न वाहण्याचे पहिल्यांदाच घडले आहे. सद्य:स्थितीला तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचाही वेग वाढला आहे. ‘चित्री’चे पात्र प्रथमच उघडे पडू लागले आहे. पाणीपातळी घटण्याचा वेग पाहून पाटबंधारे विभागाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत शेतीकरिता पाणी सोडण्याचे, तर त्यानंतर केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.चित्रीतील घटलेल्या पाणीसाठ्याचा परिणाम गडहिंग्लज तालुक्यातील शेती पिकांवरही होणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेतले जाण्याची शक्यता आहे. आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील इतर यरंडोल तलाव, खानापूर, धनगरवाडी येथेही फारशी वेगळी अवस्था नसली, तरी दोनचार जोरदार वळीव पाऊस झाल्यास त्या भागातील पाणीप्रश्न संपुष्टात येऊ शकतो, असे असले तरी या गोष्टी जर-तर वर अवलंबून असल्याने यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. (प्रतिनिधी)