शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

चिपरी ग्रामस्थांची आक्रमक : कचरा टाकू देणार नाही;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:04 IST

आत्मदहनाचा इशारा; नगरपालिकेला शोधावी लागणार पर्यायी जागा जयसिंगपूरच्या कचऱ्याचा प्रश्न चिघळला

जयसिंगपूर : जयसिंगपूरचा कचरा कोणत्याही परिस्थितीत चिपरी येथील खाणीत टाकू देणार नाही, असा इशारा देत या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधींना दिला. त्यामुळे जयसिंगपूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न आणखीनच चिघळला असून संकलन केलेला कचरा टाकायचा कोठे हा प्रश्न पालिकेसमोर आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजता नगरपालिका हद्दीतील कचरा टाकण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत पालिकेची विशेष सभा बोलाविली होती. सभेत कचरा प्रश्नावरून मोठा ऊहापोह झाला. सभेत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने सायंकाळी चिपरी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात जयसिंगपूर पालिका पदाधिकारी व चिपरी ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. ३१ डिसेंबरपर्यंत कचरा टाकण्याची मुदत जयसिंगपूर पालिकेला दिली होती. त्यामुळे १ जानेवारीपासून चिपरीच्या शेतकऱ्यांनी जयसिंगपूर पालिकेच्या कचरा डेपोसमोर चर पाडून रस्ता बंद केला. जयसिंगपुरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर बैठकीत सरपंच सुरेश भाटिया म्हणाले, चिपरी ग्रामपंचायतीमध्ये आजपर्यंत कचरा टाकण्याबाबतचा ठराव झाला नाही. कचरा डेपोच्या परिसरात पंचनामा केलेला आहे. त्यात गावापासून चार किलोमीटर अंतर असल्याचे दाखवून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी गडबडीत निर्णय घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे यापुढे या खणीत कचरा टाकू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न दोन महिन्यांत सोडविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रश्न सोडविणाऱ्यांनी आज बैठकीलाही उपस्थिती लावली नाही. कचऱ्याच्या जागेचे कंपाऊंडही बेकायदेशीर आहे, असा प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांनी त्याचा निषेध नोंदविला. नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम म्हणाल्या, पहिल्या सभेतच कचऱ्याचा प्रश्न आमच्यासमोर आला आहे. आश्वासने देऊन जे घरात बसले त्यांना फिकीर नाही. दहा वर्षांत कचरा व्यवस्थापनाचे नियोजन का झाले नाही, असा जाब विचारणार आहोत, तर कचरा डेपोच्या कंपाऊंडसाठी साडेचार कोटींच्या रकमेचे काय झाले. याची चौकशीही करणार आहोत. चिपरीकरांचा प्रश्न लवकर निकालात काढू, असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष माने यांच्यासह नगरसेवकांनी कचरा डेपोची पाहणी केली. बैठकीस पक्षप्रतोद बजरंग खामकर, नगरसेवक पराग पाटील, शीतल गतारे, शैलेश चौगुले, मुक्ताबाई वगरे, मुख्याधिकारी हेमंत निकम, उपसरपंच अभय पाटील, प्रवीण देसाई, अभिजित पाटील, राजाराम माने, रजपूत उपस्थित होते.तीन तास वादळी सभा : नगरसेवकांकडून प्रशासन धारेवरकचरा प्रश्नावरून पालिकेत झालेल्या विशेष सभेत दोन्ही आघाड्यांच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पहिलीच सभा तीन तास वादळी ठरली. उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक शिवाजी कुंभार, आस्लम फरास यांनी विस्तृत माहिती मांडून सहकार्याची भूमिका मांडली. नगरसेविका सोनाली मगदूम, सर्जेराव पवार, शैलेश चौगुले, पराग पाटील यांनी कचऱ्याप्रश्नी समन्वयातून मार्ग काढण्याची मागणी केली. नगराध्यक्षा नीता माने यांनी तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रतोद व नगरसेवक यांचे शिष्टमंडळ चिपरी ग्रामस्थांना भेटण्याबाबत निर्णय घेतला.चिपरीकर सहकार्य करानगराध्यक्ष डॉ. नीता माने म्हणाल्या, कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी तत्काळ नियोजन केले जाणार आहे. यासाठी चिपरीकरांनी पालिकेला सहकार्य करावे. चिपरीच्या शेतकऱ्यांवर दबाव आणणार नाही. कचऱ्याच्या प्रश्नासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.