शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

चिंचवाडकरांना मिळाली दिवाळीची अनोखी भेट

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी

संतोष बामणे- जयसिंगपूर -चिंचवाड (ता. शिरोळ) येथील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद संपुष्टात येत काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले. यामुळे पाच वर्षांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळी-पाडव्यादिवशी पेयजल योजनेचे उद्घाटन झाले.चिंचवाड हे कृष्णा नदीकाठावरील गाव असून, या गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी जुनी मोडकळीस आलेली पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. तसेच जलशुद्धिकरण यंत्रणा नसल्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतीकडून पाण्यात शुद्धिकरण पावडर टाकूनही ते स्वच्छ होत नव्हते. पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. २०१० साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुरी झाली होती. यासाठी एक कोटी ५९ लाखांचा निधी गावाला उपलब्ध झाला. योजना उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे राखीव जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या. चिंचवाड-शिरोळ रस्त्यालगत सहा गुंठे जागा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याठिकाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या-ना त्या कारणाने काम संथगतीने सुरू होते. गावातील नेत्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पेयजल योजनेच्या चिंचवाडात व हाळचिंचवाड येथे ६५ हजार लिटरच्या दोन अद्ययावत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाळचिंचवाडमधील पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उद्घाटन उत्साहात झाले. ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासात राजकारण नको अशी ठाम भूमिका घेऊन हा रेंगाळलेला प्रश्न सोडवून गावाच्या विकासात चालना देण्याचे काम केले असून आता गावाला शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. - प्रमोद चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, चिंचवाडगेल्या पाच वर्षांपासून चिंचवाड पेयजल योजनेचा प्रश्न संथगतीने सुरू होता. मात्र, गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी होत्या त्या दूर करून राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न निकाली काढला आहे. - प्रेमानंद उदगावे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड.