शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

चिंचवाडकरांना मिळाली दिवाळीची अनोखी भेट

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी

संतोष बामणे- जयसिंगपूर -चिंचवाड (ता. शिरोळ) येथील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद संपुष्टात येत काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले. यामुळे पाच वर्षांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळी-पाडव्यादिवशी पेयजल योजनेचे उद्घाटन झाले.चिंचवाड हे कृष्णा नदीकाठावरील गाव असून, या गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी जुनी मोडकळीस आलेली पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. तसेच जलशुद्धिकरण यंत्रणा नसल्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतीकडून पाण्यात शुद्धिकरण पावडर टाकूनही ते स्वच्छ होत नव्हते. पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. २०१० साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुरी झाली होती. यासाठी एक कोटी ५९ लाखांचा निधी गावाला उपलब्ध झाला. योजना उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे राखीव जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या. चिंचवाड-शिरोळ रस्त्यालगत सहा गुंठे जागा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याठिकाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या-ना त्या कारणाने काम संथगतीने सुरू होते. गावातील नेत्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पेयजल योजनेच्या चिंचवाडात व हाळचिंचवाड येथे ६५ हजार लिटरच्या दोन अद्ययावत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाळचिंचवाडमधील पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उद्घाटन उत्साहात झाले. ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासात राजकारण नको अशी ठाम भूमिका घेऊन हा रेंगाळलेला प्रश्न सोडवून गावाच्या विकासात चालना देण्याचे काम केले असून आता गावाला शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. - प्रमोद चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, चिंचवाडगेल्या पाच वर्षांपासून चिंचवाड पेयजल योजनेचा प्रश्न संथगतीने सुरू होता. मात्र, गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी होत्या त्या दूर करून राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न निकाली काढला आहे. - प्रेमानंद उदगावे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड.