शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवाडकरांना मिळाली दिवाळीची अनोखी भेट

By admin | Updated: November 14, 2015 00:20 IST

पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी

संतोष बामणे- जयसिंगपूर -चिंचवाड (ता. शिरोळ) येथील गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद संपुष्टात येत काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. चिंचवाड व हाळचिंचवाडमधील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळाले. यामुळे पाच वर्षांची शुद्ध पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळी-पाडव्यादिवशी पेयजल योजनेचे उद्घाटन झाले.चिंचवाड हे कृष्णा नदीकाठावरील गाव असून, या गावची लोकसंख्या पाच हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी जुनी मोडकळीस आलेली पाणीपुरवठा योजना कार्यरत आहे. तसेच जलशुद्धिकरण यंत्रणा नसल्यामुळे गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. ग्रामपंचायतीकडून पाण्यात शुद्धिकरण पावडर टाकूनही ते स्वच्छ होत नव्हते. पावसाळ्यात आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. २०१० साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे गावाला राष्ट्रीय पेयजल योजना मंजुरी झाली होती. यासाठी एक कोटी ५९ लाखांचा निधी गावाला उपलब्ध झाला. योजना उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे राखीव जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी येत होत्या. चिंचवाड-शिरोळ रस्त्यालगत सहा गुंठे जागा ग्रामपंचायतीने विकत घेऊन त्याठिकाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. या-ना त्या कारणाने काम संथगतीने सुरू होते. गावातील नेत्यांनी एकत्र येऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पेयजल योजनेच्या चिंचवाडात व हाळचिंचवाड येथे ६५ हजार लिटरच्या दोन अद्ययावत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाळचिंचवाडमधील पाण्याचा प्रश्न निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उद्घाटन उत्साहात झाले. ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली असून, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासात राजकारण नको अशी ठाम भूमिका घेऊन हा रेंगाळलेला प्रश्न सोडवून गावाच्या विकासात चालना देण्याचे काम केले असून आता गावाला शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. - प्रमोद चौगुले, ग्रामपंचायत सदस्य, चिंचवाडगेल्या पाच वर्षांपासून चिंचवाड पेयजल योजनेचा प्रश्न संथगतीने सुरू होता. मात्र, गावच्या विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाऊन पदाधिकाऱ्यांनी काही अडचणी होत्या त्या दूर करून राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न निकाली काढला आहे. - प्रेमानंद उदगावे, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवाड.