शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

आजरा कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद ...

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद

आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाची संपूर्ण रक्कम उद्या, गुरुवार (२४) जून रोजी भरली जाणार आहे. त्यामुळे कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पुन्हा एकदा पेटणार आहे.

आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकेने २६ मे २०२० पासून कारखाना आपल्या ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतेवेळी १ लाख ८० हजार साखर पोती अंदाजे ५६ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्याची विक्री जिल्हा बँकेकडून करण्यात आली आहे.

गेल्या गळीत हंगामात साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे सर्व संचालक मंडळ यांच्याकडून थकहमीची रक्कम मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही आजरा कारखान्याबाबत चर्चा झाली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही.

जिल्हा बँकेचे असणारे ६९ कोटी ८३ लाखांचे कर्ज भरण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी संघटित प्रयत्न केला आहे. त्याला यशही आले आहे.

थकीत कर्जाच्या रकमेपैकी काही रक्कम आज भरण्यातही आली आहे. उर्वरित रक्कम उद्या भरली जाणार आहे. त्यानंतर कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडून कारखाना प्रशासनाकडे लिा??????? जाणार आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात आजरा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.