शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आजरा कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद ...

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद

आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाची संपूर्ण रक्कम उद्या, गुरुवार (२४) जून रोजी भरली जाणार आहे. त्यामुळे कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पुन्हा एकदा पेटणार आहे.

आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकेने २६ मे २०२० पासून कारखाना आपल्या ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतेवेळी १ लाख ८० हजार साखर पोती अंदाजे ५६ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्याची विक्री जिल्हा बँकेकडून करण्यात आली आहे.

गेल्या गळीत हंगामात साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे सर्व संचालक मंडळ यांच्याकडून थकहमीची रक्कम मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही आजरा कारखान्याबाबत चर्चा झाली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही.

जिल्हा बँकेचे असणारे ६९ कोटी ८३ लाखांचे कर्ज भरण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी संघटित प्रयत्न केला आहे. त्याला यशही आले आहे.

थकीत कर्जाच्या रकमेपैकी काही रक्कम आज भरण्यातही आली आहे. उर्वरित रक्कम उद्या भरली जाणार आहे. त्यानंतर कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडून कारखाना प्रशासनाकडे लिा??????? जाणार आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात आजरा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.