शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

आजरा कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद ...

: आर्थिक संकटामुळे कारखाना दोन वर्षांपासून बंद

आजरा : आजरा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जाची संपूर्ण रक्कम उद्या, गुरुवार (२४) जून रोजी भरली जाणार आहे. त्यामुळे कारखान्याचे धुराडे येत्या गळीत हंगामात पुन्हा एकदा पेटणार आहे.

आजरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता थकीत राहिल्याने बँकेने २६ मे २०२० पासून कारखाना आपल्या ताब्यात घेतला आहे. जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतेवेळी १ लाख ८० हजार साखर पोती अंदाजे ५६ कोटी रुपयांची शिल्लक होती. त्याची विक्री जिल्हा बँकेकडून करण्यात आली आहे.

गेल्या गळीत हंगामात साखर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर, कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे सर्व संचालक मंडळ यांच्याकडून थकहमीची रक्कम मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही आजरा कारखान्याबाबत चर्चा झाली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही.

जिल्हा बँकेचे असणारे ६९ कोटी ८३ लाखांचे कर्ज भरण्यासाठी नामदार हसन मुश्रीफ, नामदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, कारखान्याचे सर्व आजी-माजी संचालक, तालुक्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी संघटित प्रयत्न केला आहे. त्याला यशही आले आहे.

थकीत कर्जाच्या रकमेपैकी काही रक्कम आज भरण्यातही आली आहे. उर्वरित रक्कम उद्या भरली जाणार आहे. त्यानंतर कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडून कारखाना प्रशासनाकडे लिा??????? जाणार आहे. त्यामुळे येत्या गळीत हंगामात आजरा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.