शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

मदरशांमधील मुले शाळाबाह्यच

By admin | Updated: July 2, 2015 00:45 IST

राज्य सरकारचा निर्णय : शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : मदरशांमधून धार्मिक शिक्षण घेणारी मुस्लिम समाजातील मुले ही शाळाबाह्य ठरवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २० मे २०१५ रोजी तसा अध्यादेश काढून या मुलांना सरकारी शाळेत घालण्याची कार्यवाही केली जाणार असल्याने हा विषय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे धार्मिक शिक्षण देणारे १२ मदरसे असून, सुमारे अडीच हजार मुुस्लिम विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ‘गुरुकुल’च्या धर्तीवर असलेल्या या मदरशांमध्ये मौलवी अर्थात धर्मगुरू होण्यासाठी सात वर्षे शिक्षण घ्यावे लागते. मदरशांना वक्फ मंडळाची मान्यता घेतली जाते. राज्य सरकारची वेगळी परवानगी घेतली जात नाही. राज्यातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलाना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोहीम सरकारने हाती घेतली. २० मे २०१५ रोजी अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. अध्यादेशाच्या अंमलबजावणी करिता जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ४ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात असे मदरशातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार असून, पुढच्या आठ दिवसांत त्यांना नियमित शाळेत सामावून घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी) राज्य सरकारने शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगधंदे, वीटभट्ट्या, दगडखाणी, स्थलांतरित कुटुंब यांसह मदरशांमधील बालकेही शाळाबाह्य ठरवून त्यांना मुख्य शाळेत घालण्यात यावे, असे सरकारचे निर्देश आहेत. - स्मिता गौड प्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद जिल्ह्यातील १३ मदरशांमधून दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यात येते. शिवाय नियमित शाळेतील अभ्यासक्रमही शिकविला जातो. येथे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार केले जातात. संस्कारक्षम नागरिक तयार केले जातात. त्यामुळे गैरसमज तसेच तेढ निर्माण होईल, असे निर्णय कोणी घेऊ नयेत. - कादर मलबारी,सुपरिंटेंडेंट, मुस्लिम बोर्डिंग