शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
3
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
4
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
5
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
6
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
7
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
8
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
9
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
10
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
11
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
12
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
13
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
14
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
15
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
16
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
17
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
18
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
19
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
20
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा

धोका पत्करून पाण्यात मुलांच्या उड्या...!

By admin | Updated: April 8, 2017 21:47 IST

सातारा शहरातील स्थिती : पोहण्याचे तलाव बंद असल्याने कॅनॉल, नदी, विहिरींवर गर्दी; पालकांचे होतेय दुर्लक्ष

सातारा : सातारा शहरातील नगरपालिकेचे पोहण्याचा तलाव यंदाही सुरू होणार नसल्याची कुणकुण लागल्यानंतर धोका पत्करून मुलांचे पाण्यातील खेळ सुरू झाले आहेत. तलाव बंद असल्याने अनेक मुलं या परिसरातील कॅनॉल, नदी, विहीर व तलावात पोहण्यासाठी जात आहेत. या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गत सप्ताहापासून सुट्या लागल्या आहेत. या सुट्यांमध्ये काहीतरी धम्माल करण्याची उर्मी असलेल्या या विद्यार्थ्यांना परिसरातील पाणी खुणावत आहे. पूर्वी सातारा नगरपालिकेचे पोहण्याचे तलाव खुले करण्यात येत असल्याने येथे शहरातील मुले आणि मुली दोन स्वतंत्र बॅचमध्ये मोठ्या संख्येने पोहण्यासाठी येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून जुन्या नगरपालिका शेजारी असलेला पालिकेचा एकमेव पोहण्याचा तलाव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अन्य खर्चीक तलावांवर पोहायला जाण्यापेक्षा शहरालगत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी जाण्यास ही मुलं प्राधान्य देत आहेत. घरातून खाऊचा डबा घेऊन मनसोक्त पोहल्यानंतर जवळपास झाड बघून थोडा डुलका काढून मग ही मुलं संध्याकाळी घरी परतत आहेत. साताऱ्यातील मागील दोन आठवड्यांत ३८ ते ४० अंश सेल्सिअस पारा झाला आहे. त्यामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारणास्तव उन्हात इतर खेळ खेळण्यासाठी सहसा कोणीच सापडत नसल्याने लहान मुलांनी पोहण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे सध्या फुटके तलाव, गोडोली तळे, कण्हेर कॅनॉल, विहिरी, कृष्णा नदी येथे मुलांच्या संख्येत वाढ होत आहे.सध्या नदीला पाणी कमी असले तरी तळ्यांना व विहिरींना पाणी अधिक चांगले आहे. यांची खोलीही अधिक आहे. अनेक लहान मुले एकमेकांचे पाहून या डोहात उड्या टाकत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांना सांगून किंवा काहीदा त्यांना न सांगता आलेल्या या मुलांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. चुकून काही दुर्घटना घडलीच तर या मुलांना तातडीने मदत उपलब्ध करून देणे आणि त्यांचा प्राण वाचविणे याविषयी ही मुलं गंभीर नाहीत. पाण्यात खेळत असताना परस्परांबरोबर दंगा करणे, पोहायला न येणाऱ्याला बळजबरीने ढकलण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. पोहण्यातील या संभाव्य धोक्यांची जाणीव पालकांसह विद्यार्थ्यांनाही असणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी) ही आहेत धोक्याची ठिकाणं...!गतवर्षी कण्हेर डाव्या कालव्यात कपडे धुवायला आलेल्या सख्ख्या तीन बहीण-भावांचा मृत्यू या कालव्यात वाहून गेल्याने झाला. निसरड्या पायऱ्या, बदलत जाणारा पाण्याचा प्रवाह, कालव्याच्या खोलीचा अंदाज न येणं यामुळे कण्हेर डावा कालवा एकट्या मुलांच्या खेळासाठी असुरक्षित म्हणून गणला जातो. तसेच गोडोली तळे आणि फुटके तळे यांची खोली जास्त असल्याने ‘दम’ लागण्याचा प्रकार अधिक होतो. हे लक्षात न आल्यानेही मुलांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इथं होते पोहायला गर्दीसातारा शहरात असलेल्या फुटका तलावात दुपारी एकनंतर मुलांची पोहण्यासाठी गर्दी होते. याबरोबरच गोडोली तळ्यातही ग्रुपने जाऊन मुलं पोहण्याचा आनंद घेतात. तळ्यांबरोबरच साताऱ्यातून गेलेला कण्हेरचा डावा कालवा मुलांच्या हिटलिस्टवर आहे. तसेच शहापूर येथेही वाकळा धुवायला आलेल्यांना बरोबर असलेली मुलं पोहण्याचा मनसोक्त आंनद घेत असतानाचे चित्र दिसते. काही महाविद्यालयीन ग्रुप आपापल्या गाड्या काढून कास तलावात पोहण्याचा आनंद घेत आहे. सकाळी १० वाजता निघालेली ही पोरं संध्याकाळीच साताऱ्याकडे रवाना होताना पाहायला मिळतात.