शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बाल साहित्य दिशादर्शक

By admin | Updated: November 18, 2014 00:08 IST

शिवाजीराव भुकेले : किणी येथे १२व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात

किणी : बाल साहित्य दिशा दिग्दर्शनाचे काम करीत असून, हे साहित्य बालकांचे मन समृद्ध करते. बालकांची उद्याची दुनिया समृद्ध करण्यासाठी अशा साहित्य संमेलनाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रवचनकार प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी केले.किणी (ता. हातकणंगले) येथे जिनेंद्र क्रिएशन व मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे मराठी बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. मा. ग. गुरव होते. यावेळी सभेचे अध्यक्ष गोविंद गोडबोले हाते.प्रा. भुकेले म्हणाले, जगातील सर्वांत अवघड साहित्यिक प्रकार हा बाल साहित्य आहे. या साहित्याकडे हजारो नजरा असतात. त्यामुळे बालकांची समृद्धता वाढविण्यासाठी या साहित्याचा उपयोग होतो. बालकांना लहानपणापासून पुस्तकाशी मैत्री करायला शिकविले पाहिजे. कथाकार, नाटककार, कवी अशा संमेलनातूनच निर्माण होतील. निष्ठावंत वर्ग साहित्यातून निर्माण होईल, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.डॉ. मा. ग. गुरव म्हणाले, आज घरात आणि बाहेरही मुक्त संवाद कमी होत चालला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बालकांची मैत्री घट्ट होताना दिसत असून, त्याचे दुष्परिणाम तपासून पाहिले पाहिजेत. बालसाहित्यास गती मिळण्यासाठी बालक, पालक, शिक्षक याचबरोबर साहित्यिकांनी मेहनतीने काम करणे गरजेचे आहे. बालसाहित्यातून बिजे रुजविली जातील. ग्रामीण भागातील हे नववे संमेलन आहे याचा अभिमान असून, मिळालेला प्रतिसाद पाहता संमेलन यशस्वी झाले, असे म्हणावे लागेल.गोविंद गोडबोले म्हणाले, या संमेलनामुळे बालक यशवंत, गुणवंत होतील, वाचन संस्कृती वाढेल, तर साहित्यिक ग्रामीण भागातून निर्माण होऊन संमेलन यशस्वी होतील. त्यांनी संवाद साधत विद्यार्थ्यांनाही बोलते केले.स्वागत अध्यक्ष राजकुमार चौगुले म्हणाले, साहित्य हे संवाद साधण्याचे प्रभावी साधन असून, ज्ञानात भर घालण्यासाठी व जगण्याचे बळ देण्यासाठी साहित्य उपयोगी पडते. या संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडी सोहळ्यात विविध मान्यवरांसह शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फुलांनी सजविलेली ही ग्रंथदिंडी संमेलनाचे खास आकर्षण ठरली.यावेळी दहावीत मराठी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळविणारी मजले हायस्कूलची कु. नेहा पाटील व राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. श्रीकांत पाटील यांना गौरविण्यात आले.प्रभंजन चौगुले यांच्या तंत्र अभ्यासाचे, माती आभाळाशी बोले (डॉ. श्रीकांत पाटील), चिमुकल्यांच्या कविता (अनिकेत सुतार), शिदोरी (मनोहर मोहिते), या साहित्याचे प्रकाशन झाले. काव्यसत्रात शाम कुरळे, रमेश इंगवले, श्रृतिका पाटील, अपूर्वा नलवडे, प्रथमेश शेळके, स्नेहल माळी, प्रज्ञा जोशी, नंदिनी पाटील, आदी बालकांनी भाग घेतला.यावेळी कार्यवाह अशोक पाटील, बाळ पोतदार, डॉ. श्रीकांत पाटील यांची भाषणे व कथाकथन झाले. स्वस्तिक माळी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश देवकर यांनी आभार मानले.दरम्यान, गावातील प्रमुख मार्गांवरून विविध वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी पार पडली. यावेळी साहित्यिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)