शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

बालकामगार येताहेत शिक्षणाच्या प्रवाहात

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

बालकामगार विरोधी दिन : १२00 कुटुंबांतील १७00 मुले घेताहेत शिक्षण; ‘अवनि’चे सहकार्य

संदीप आडनाईक - कोल्हापूर  प्रत्येक बालकाला शिक्षण हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे २००९ मध्ये सरकारने ठरविले होते. पाच वर्षांनंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे चित्र दृश्य स्वरूपात दिसत असले तरी यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके आजही मूलभूत शिक्षण हक्कांपासून वंचितच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील १२०० मजूर कुटुंबांचा ‘अवनि’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ १७०० मुलेच शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे स्पष्ट होते आहे. यातील बहुतांश बालके ही कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, ते केवळ अवनी या संस्थेमुळेच. मात्र, इतर दोन्ही जिल्ह्यांत अशा प्रकारची काम करणारी कोणतीही स्वयंसेवी संस्था पुढे आली नसल्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांची संख्या आणखीन जास्त असण्याची शक्यता आहे.‘अवनि’ या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. अवनी संस्थेने वीटभट्टीवरील कामगार, स्थलांतरित ऊसतोड कामगार, बांधकाम व्यवसायातील स्थलांतरित मजूर आणि महामार्गावरील धाब्यावरील बालकामगारांचे सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये ० ते ३ वयोगटातील आणि ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित असणारे १७०० बालकामगारांची नोंद झाली आहे. या सर्वच बालकांना अवनी संस्थेने त्यांच्या बालगृहात तसेच संबंधित ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात पुढाकार घेतला. यासंदर्भात आॅक्टोबर महिन्यात अवनी संस्थेने त्यांना प्रवेश मिळवून देण्यात यश मिळविले. आता यातील काही बालकामगार जिल्हा परिषदेच्या वाकरे, दोनवडे, खुपिरे, सरनोबतवाडी तसेच शिरोळ तालुक्यातील उदगाव आणि चिंचवाड येथील शाळेमध्ये शिकत आहेत. ० ते ३ वयोगटातील बालकामगारांच्या शिक्षणासाठी ‘अवनी’ संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ ठिकाणी हंगामी बालवाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये ७०० मुले शिक्षण घेत असल्याची माहिती अवनी संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते यांनी दिली.साखरशाळांनाही प्रतिसादअवनि संस्थेने सुरू केलेल्या साखरशाळांनाही प्रतिसाद मिळाला आहे. कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरातील ४५ आणि कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना परिसरात ६ ते १४ वयोगटातील ४७ बालकांनी या हंगामी साखरशाळांमध्ये शिक्षण घेतले.