शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

बालकामगार येताहेत शिक्षणाच्या प्रवाहात

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

बालकामगार विरोधी दिन : १२00 कुटुंबांतील १७00 मुले घेताहेत शिक्षण; ‘अवनि’चे सहकार्य

संदीप आडनाईक - कोल्हापूर  प्रत्येक बालकाला शिक्षण हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे २००९ मध्ये सरकारने ठरविले होते. पाच वर्षांनंतर शिक्षणाचा मूलभूत अधिकार हे चित्र दृश्य स्वरूपात दिसत असले तरी यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील वीटभट्टीवरील स्थलांतरित मजुरांची शेकडो बालके आजही मूलभूत शिक्षण हक्कांपासून वंचितच आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील १२०० मजूर कुटुंबांचा ‘अवनि’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ १७०० मुलेच शिक्षणाच्या प्रवाहात असल्याचे स्पष्ट होते आहे. यातील बहुतांश बालके ही कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, ते केवळ अवनी या संस्थेमुळेच. मात्र, इतर दोन्ही जिल्ह्यांत अशा प्रकारची काम करणारी कोणतीही स्वयंसेवी संस्था पुढे आली नसल्यामुळे या दोन जिल्ह्यांतील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या बालकांची संख्या आणखीन जास्त असण्याची शक्यता आहे.‘अवनि’ या संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली. अवनी संस्थेने वीटभट्टीवरील कामगार, स्थलांतरित ऊसतोड कामगार, बांधकाम व्यवसायातील स्थलांतरित मजूर आणि महामार्गावरील धाब्यावरील बालकामगारांचे सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले होते. यामध्ये ० ते ३ वयोगटातील आणि ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित असणारे १७०० बालकामगारांची नोंद झाली आहे. या सर्वच बालकांना अवनी संस्थेने त्यांच्या बालगृहात तसेच संबंधित ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात पुढाकार घेतला. यासंदर्भात आॅक्टोबर महिन्यात अवनी संस्थेने त्यांना प्रवेश मिळवून देण्यात यश मिळविले. आता यातील काही बालकामगार जिल्हा परिषदेच्या वाकरे, दोनवडे, खुपिरे, सरनोबतवाडी तसेच शिरोळ तालुक्यातील उदगाव आणि चिंचवाड येथील शाळेमध्ये शिकत आहेत. ० ते ३ वयोगटातील बालकामगारांच्या शिक्षणासाठी ‘अवनी’ संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ ठिकाणी हंगामी बालवाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये ७०० मुले शिक्षण घेत असल्याची माहिती अवनी संस्थेचे कार्यकर्ते साताप्पा मोहिते यांनी दिली.साखरशाळांनाही प्रतिसादअवनि संस्थेने सुरू केलेल्या साखरशाळांनाही प्रतिसाद मिळाला आहे. कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना परिसरातील ४५ आणि कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना परिसरात ६ ते १४ वयोगटातील ४७ बालकांनी या हंगामी साखरशाळांमध्ये शिक्षण घेतले.