शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पावनगडावरील मदरशामध्ये मुलांची हेळसांड

By admin | Updated: January 20, 2017 01:18 IST

सर्व मुले बिहारची : शिक्षणासाठी आणली; पुरसे अन्न, पांघरूणही नाही; शिक्षण विभाग अंधारात

नितीन भगवान -- पन्हाळा पन्हाळ्यातील पावनगडावर असलेल्या मदरशामध्ये बिहारमधील २१ मुले शिक्षण घेण्यासाठी आली असून, गेले महिनाभर या मुलांना पोटभर अन्न मिळालेले नाही. कुडकुडणाऱ्या थंडीत त्यांना पुरेसे पांघरायलाही नाही. त्यांच्या शिक्षणाकडे डोळेझाक होत असून रोजच्या व्यवहारातील कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथील सेवा मदतीवर अवलंबून असून, मदत अपुरी मिळते. त्याचाही गैरवापर होत असल्याचे समजते. पावनगडावर बहुतेक मुस्लिम वस्ती आहे. या ठिकाणी सालिक मोमीन शेख याने बिहारमधील आरडिया जिल्ह्यातील डुबा या एकाच गावातील या सर्वांना शिक्षण देतो म्हणून आणल्याचे मुलांनी सांगितले. गेले वर्षभर या मुलांची पावनगडावर पूर्वी बंद असलेल्या मदरशाच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. ५ ते १४ वयोगटांतील ही २१ मुले आहेत. मदरशाजवळच्या विहिरीतून या सर्व मुलांना पिण्यासह अंघोळीचे पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही. याठिकाणी संपूर्ण सेवा मदतीवर अवलंबून आहे. मात्र, मदत अपुरी आहे. त्यातच या मदतीचा गैरवापर होत असल्यामुळे या मुलांना गेले महिनाभर पोटभर अन्न मिळालेले नाही. अंग गोठवणारी थंडी असूनही पुरेसे पांघरूणदेखील नाही. पावनगडावर राहणाऱ्या बहुतेक जणांना या मुलांची परिस्थिती माहीत असल्याने काहीजण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर येथील शिक्षक मुलांच्या मदतीसाठी निव्वळ फिरत असतात.या मुलांना उर्दू, अरेबीसह इंग्रजी शिक्षण देत असल्याचे तेथील शिक्षक सांगतात. तथापि, या मुलांना तसे काही शिकविले जात नसल्याचे या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात आले. पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयापासून सर्वच कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांकडे चौकशी केली असता याठिकाणी अशा पद्धतीची शाळा चालू आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग या मुलांच्या भवितव्याकडे कोण पाहणार, हा प्रश्न आहे. पन्हाळ्यातील शिक्षण विभागाला पावनगडावर अशी शाळा सुरू आहे हे माहीत नाही. त्याची आमच्याकडे नोंद नाही. खरंतर ही मुले शाळाबाह्य आहेत. आज, शुक्रवारी या मुलांची भेट घेणार आहे. त्यांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - सारिका कासोटे, गटशिक्षण अधिकारी, पन्हाळा आरोग्याचा प्रश्नही गंभीर या ठिकाणी शाळा चालू आहे हेच शिक्षण विभागाला माहीत नाही. शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीमध्ये ही मुले नोंद नाहीत. नगरपरिषद हद्दीत ही शाळा येत असल्याने याठिकाणचे विहिरीचे पाणी, त्याची स्वच्छता यासाठी नगरपरिषद काही करत नाही. तालुका वैद्यकीय अधिकारीही भेट देत नाहीत. त्यामुळे हा सगळाच अनागोंदी कारभार सुरू आहे. यात मुलांची मात्र हेळसांड होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे.