शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावनगडावरील मदरशामध्ये मुलांची हेळसांड

By admin | Updated: January 20, 2017 01:18 IST

सर्व मुले बिहारची : शिक्षणासाठी आणली; पुरसे अन्न, पांघरूणही नाही; शिक्षण विभाग अंधारात

नितीन भगवान -- पन्हाळा पन्हाळ्यातील पावनगडावर असलेल्या मदरशामध्ये बिहारमधील २१ मुले शिक्षण घेण्यासाठी आली असून, गेले महिनाभर या मुलांना पोटभर अन्न मिळालेले नाही. कुडकुडणाऱ्या थंडीत त्यांना पुरेसे पांघरायलाही नाही. त्यांच्या शिक्षणाकडे डोळेझाक होत असून रोजच्या व्यवहारातील कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथील सेवा मदतीवर अवलंबून असून, मदत अपुरी मिळते. त्याचाही गैरवापर होत असल्याचे समजते. पावनगडावर बहुतेक मुस्लिम वस्ती आहे. या ठिकाणी सालिक मोमीन शेख याने बिहारमधील आरडिया जिल्ह्यातील डुबा या एकाच गावातील या सर्वांना शिक्षण देतो म्हणून आणल्याचे मुलांनी सांगितले. गेले वर्षभर या मुलांची पावनगडावर पूर्वी बंद असलेल्या मदरशाच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. ५ ते १४ वयोगटांतील ही २१ मुले आहेत. मदरशाजवळच्या विहिरीतून या सर्व मुलांना पिण्यासह अंघोळीचे पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही. याठिकाणी संपूर्ण सेवा मदतीवर अवलंबून आहे. मात्र, मदत अपुरी आहे. त्यातच या मदतीचा गैरवापर होत असल्यामुळे या मुलांना गेले महिनाभर पोटभर अन्न मिळालेले नाही. अंग गोठवणारी थंडी असूनही पुरेसे पांघरूणदेखील नाही. पावनगडावर राहणाऱ्या बहुतेक जणांना या मुलांची परिस्थिती माहीत असल्याने काहीजण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर येथील शिक्षक मुलांच्या मदतीसाठी निव्वळ फिरत असतात.या मुलांना उर्दू, अरेबीसह इंग्रजी शिक्षण देत असल्याचे तेथील शिक्षक सांगतात. तथापि, या मुलांना तसे काही शिकविले जात नसल्याचे या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात आले. पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयापासून सर्वच कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांकडे चौकशी केली असता याठिकाणी अशा पद्धतीची शाळा चालू आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग या मुलांच्या भवितव्याकडे कोण पाहणार, हा प्रश्न आहे. पन्हाळ्यातील शिक्षण विभागाला पावनगडावर अशी शाळा सुरू आहे हे माहीत नाही. त्याची आमच्याकडे नोंद नाही. खरंतर ही मुले शाळाबाह्य आहेत. आज, शुक्रवारी या मुलांची भेट घेणार आहे. त्यांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - सारिका कासोटे, गटशिक्षण अधिकारी, पन्हाळा आरोग्याचा प्रश्नही गंभीर या ठिकाणी शाळा चालू आहे हेच शिक्षण विभागाला माहीत नाही. शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीमध्ये ही मुले नोंद नाहीत. नगरपरिषद हद्दीत ही शाळा येत असल्याने याठिकाणचे विहिरीचे पाणी, त्याची स्वच्छता यासाठी नगरपरिषद काही करत नाही. तालुका वैद्यकीय अधिकारीही भेट देत नाहीत. त्यामुळे हा सगळाच अनागोंदी कारभार सुरू आहे. यात मुलांची मात्र हेळसांड होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे.