शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पावनगडावरील मदरशामध्ये मुलांची हेळसांड

By admin | Updated: January 20, 2017 01:18 IST

सर्व मुले बिहारची : शिक्षणासाठी आणली; पुरसे अन्न, पांघरूणही नाही; शिक्षण विभाग अंधारात

नितीन भगवान -- पन्हाळा पन्हाळ्यातील पावनगडावर असलेल्या मदरशामध्ये बिहारमधील २१ मुले शिक्षण घेण्यासाठी आली असून, गेले महिनाभर या मुलांना पोटभर अन्न मिळालेले नाही. कुडकुडणाऱ्या थंडीत त्यांना पुरेसे पांघरायलाही नाही. त्यांच्या शिक्षणाकडे डोळेझाक होत असून रोजच्या व्यवहारातील कोणतेही शिक्षण दिले जात नाही. येथील सेवा मदतीवर अवलंबून असून, मदत अपुरी मिळते. त्याचाही गैरवापर होत असल्याचे समजते. पावनगडावर बहुतेक मुस्लिम वस्ती आहे. या ठिकाणी सालिक मोमीन शेख याने बिहारमधील आरडिया जिल्ह्यातील डुबा या एकाच गावातील या सर्वांना शिक्षण देतो म्हणून आणल्याचे मुलांनी सांगितले. गेले वर्षभर या मुलांची पावनगडावर पूर्वी बंद असलेल्या मदरशाच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. ५ ते १४ वयोगटांतील ही २१ मुले आहेत. मदरशाजवळच्या विहिरीतून या सर्व मुलांना पिण्यासह अंघोळीचे पाणी दिले जाते. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही. याठिकाणी संपूर्ण सेवा मदतीवर अवलंबून आहे. मात्र, मदत अपुरी आहे. त्यातच या मदतीचा गैरवापर होत असल्यामुळे या मुलांना गेले महिनाभर पोटभर अन्न मिळालेले नाही. अंग गोठवणारी थंडी असूनही पुरेसे पांघरूणदेखील नाही. पावनगडावर राहणाऱ्या बहुतेक जणांना या मुलांची परिस्थिती माहीत असल्याने काहीजण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर येथील शिक्षक मुलांच्या मदतीसाठी निव्वळ फिरत असतात.या मुलांना उर्दू, अरेबीसह इंग्रजी शिक्षण देत असल्याचे तेथील शिक्षक सांगतात. तथापि, या मुलांना तसे काही शिकविले जात नसल्याचे या मुलांशी बोलल्यानंतर लक्षात आले. पन्हाळा हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी उपविभागीय कार्यालयापासून सर्वच कार्यालये आहेत. या सर्वच कार्यालयांकडे चौकशी केली असता याठिकाणी अशा पद्धतीची शाळा चालू आहे हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग या मुलांच्या भवितव्याकडे कोण पाहणार, हा प्रश्न आहे. पन्हाळ्यातील शिक्षण विभागाला पावनगडावर अशी शाळा सुरू आहे हे माहीत नाही. त्याची आमच्याकडे नोंद नाही. खरंतर ही मुले शाळाबाह्य आहेत. आज, शुक्रवारी या मुलांची भेट घेणार आहे. त्यांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - सारिका कासोटे, गटशिक्षण अधिकारी, पन्हाळा आरोग्याचा प्रश्नही गंभीर या ठिकाणी शाळा चालू आहे हेच शिक्षण विभागाला माहीत नाही. शाळाबाह्य मुलांच्या नोंदणीमध्ये ही मुले नोंद नाहीत. नगरपरिषद हद्दीत ही शाळा येत असल्याने याठिकाणचे विहिरीचे पाणी, त्याची स्वच्छता यासाठी नगरपरिषद काही करत नाही. तालुका वैद्यकीय अधिकारीही भेट देत नाहीत. त्यामुळे हा सगळाच अनागोंदी कारभार सुरू आहे. यात मुलांची मात्र हेळसांड होत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे.