शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

‘चिकोत्रा’त पाणी सोडणार

By admin | Updated: October 4, 2015 00:47 IST

धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने

कोल्हापूर : चिकोत्रा धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. त्यातील बाष्पीभवन तसेच अन्य कारणांनी वाया जाणारे पाणी वगळता २५० ते ३०० दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खोऱ्यातील धोक्यात आलेल्या पिकांसाठी पाण्याची दोन आवर्तने करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी (दि. २) जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत दिले. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. चिकोत्रा खोऱ्याला दोन आवर्तने दिल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील, ते पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. पाण्याअभावी चिकोत्रा खोऱ्यातील ऊसपीक धोक्यात आले आहे. पिकांना वाचविण्यासाठी पाणी सोडण्याची गरज असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. तीन दिवसांपासून चिकोत्रा परिसरातही दमदार पाऊस सुुरू आहे. यामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे महिन्याभरानंतर पाण्याचे आवर्तन करण्याचाही निर्णय झाला. या परिसरातील उसाची तोड प्राधान्यक्रमाने केली जाईल, त्याबाबत साखर कारखान्यांना सूचना द्याव्यात. तसेच यापुढे ऊसाची लागवड करू नये, असा निर्णयही घेण्यात आला. दौलत कारखान्याच्या कर्जास हप्ते घालून देण्याची मागणीही मुश्रीफ यांनी केली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. डी. साळुंखे, कार्यकारी अभियंता विजय पाटील, एस. एम. चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)