शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

चिकोत्रा प्रकल्पग्रस्तांचे २५ पासून धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पग्रस्तांचे गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्वसन झालेले नाही, त्यांना निर्वाह भत्तादेखील मिळालेला नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणग्रस्त ...

कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पग्रस्तांचे गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्वसन झालेले नाही, त्यांना निर्वाह भत्तादेखील मिळालेला नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी धरणग्रस्त २५ जानेवारीपासून धरणे आंदाेलन करणार असल्याची माहिती जनता दलाचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी मंगळवारी दिली.

ते म्हणाले, गणपती गवंडी (सध्या राहणार पिंपळगाव) यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी गेल्या १२-१५ वर्षांपासून देय जमिनीसह पुनर्वसनाची मागणी केली आहे. मात्र त्यावेळी पुनर्वसन विभागाने कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जमीन कब्जा देण्यास टाळाटाळ केली. वारंवार याबाबत विचारणा केल्यानंतर २०१४ मध्ये कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी येथील गट क्र. २११ या जमिनीचा आदेश दिला. त्याचदिवशी शासकीय प्रतिनिधीसह धरणग्रस्त गेले असता, मूळ मालक हायकोर्टात गेल्याचे कारण दाखवून त्यांना परत पाठवण्यात आले. तरी त्यांना निर्वाह भत्ता मिळावा व त्वरित जमीन देण्यात यावी अन्यथा कुटुंबासह ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसतील, असा इशारा देण्यात आला आहे.

--