शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

‘चिकोत्रा’ची उपसाबंदी चार दिवसांसाठी शिथिल

By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST

शेतीसाठी परवाना : १६ टक्के पाणी; जूनअखेर तहान भागणार

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे--चिकोत्रा धरणातील अल्प पाणीसाठा लक्षात घेता पाटबंधारे विभागाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पूर्णत: उपसाबंदी लागू केली होती. या धरणामध्ये सध्या २५ द.श.ल.घ.फूट इतकाच म्हणजेच केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या नदीवरील सर्वच १८ बंधाऱ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणी असून, त्याचा वापर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्यासाठीच केला जात आहे. असे असले तरी या बंधाऱ्यासह नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी खराब होऊन ते पिण्यासाठी अयोग्य होते. त्यामुळे धरणातून पुढील पाणी सोडण्यापूर्वी २ ते ५ मे या कालावधीत उपसाबंधी शिथिल करून हे पाणी पिकांसाठी उपसा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा उपसाबंदी लागू केली जाणार आहे. सध्या धरणात जूनअखेर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाचा जलस्रोतच अत्यंत कमकुवत आहे. धरणात अधिकाधिक पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने धरणाच्या दक्षिणेकडील ओढे, नाले या धरणात वळविण्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर फारसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात अडचणी येत आहेत. तसेच यंदा पाऊसही अपुरा झाल्यामुळे हे धरण केवळ ४६ टक्केच भरले. त्यामुळे प्रशासनाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यात दुष्काळाच्या झळा गडद होऊन येथील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला. सहकार्य करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहनदरम्यान, या महिन्यात ५ ते ८ एप्रिल या कालावधीत ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काही बडे शेतकरी आणि राजकीय वरदहस्त असणारे उपसाबंदी झुगारून अवैध पाणी उपसा करीत असतात, असेही निदर्शनास येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी सर्वांनी उपसाबंदी उठविलेल्या कालावधीत उपसा करून सहकार्य करण्याचे आवाहनही पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.