शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा’ची उपसाबंदी चार दिवसांसाठी शिथिल

By admin | Updated: April 28, 2016 00:21 IST

शेतीसाठी परवाना : १६ टक्के पाणी; जूनअखेर तहान भागणार

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे--चिकोत्रा धरणातील अल्प पाणीसाठा लक्षात घेता पाटबंधारे विभागाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पूर्णत: उपसाबंदी लागू केली होती. या धरणामध्ये सध्या २५ द.श.ल.घ.फूट इतकाच म्हणजेच केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या नदीवरील सर्वच १८ बंधाऱ्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाणी असून, त्याचा वापर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्यासाठीच केला जात आहे. असे असले तरी या बंधाऱ्यासह नदीपात्रातील खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी खराब होऊन ते पिण्यासाठी अयोग्य होते. त्यामुळे धरणातून पुढील पाणी सोडण्यापूर्वी २ ते ५ मे या कालावधीत उपसाबंधी शिथिल करून हे पाणी पिकांसाठी उपसा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा उपसाबंदी लागू केली जाणार आहे. सध्या धरणात जूनअखेर चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे.धरणाचा जलस्रोतच अत्यंत कमकुवत आहे. धरणात अधिकाधिक पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने धरणाच्या दक्षिणेकडील ओढे, नाले या धरणात वळविण्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर फारसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात अडचणी येत आहेत. तसेच यंदा पाऊसही अपुरा झाल्यामुळे हे धरण केवळ ४६ टक्केच भरले. त्यामुळे प्रशासनाने १0 जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चिकोत्रा खोऱ्यात दुष्काळाच्या झळा गडद होऊन येथील शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला. सहकार्य करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहनदरम्यान, या महिन्यात ५ ते ८ एप्रिल या कालावधीत ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, काही बडे शेतकरी आणि राजकीय वरदहस्त असणारे उपसाबंदी झुगारून अवैध पाणी उपसा करीत असतात, असेही निदर्शनास येत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी सर्वांनी उपसाबंदी उठविलेल्या कालावधीत उपसा करून सहकार्य करण्याचे आवाहनही पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.