शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांचा मेल आयडी केला ‘ब्लॉक’

By admin | Updated: July 29, 2014 00:46 IST

१ लाखांहून अधिक मेल : लिंगायत समाजबांधवांनी केले अभिनव आंदोलन

कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आज, सोमवारी राज्यभरातून समाजबांधवांनी १ लाखांहून अधिक मागण्यांचे मेल करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘ईमेल आयडी’ ब्लॉक केला. या अभिनव आंदोलनाची दिवसभर चर्चा होती; परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्याने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजातर्फे देण्यात आला आहे.लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा द्यावा, या समाजाचा ‘ओबीसी’मध्ये समावेश करावा. तसेच या समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, आदी मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे; परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ मध्यरात्री बारापासून आज सायंकाळी साडेपाचपर्यंत राज्यातील लिंगायत समाज बांधवांनी मागण्यांचे मेल मुख्यमंत्र्यांच्या ई मेल आयडीवर केले. रात्री बारापासून हे मेल धडकत होते. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांचा मेल बॉक्सच ब्लॉक झाला. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकली. १ लाखांहून अधिक मेलमधील ८७ हजार ४२३ मेल हे पुण्यातून करण्यात आले. या ठिकाणी राज्यभरातील समाजबांधवांचे मेल आयडींचे सेंट्रलायझेशन केले होते. तसेच उरलले मेल हे थेट ज्या-त्या शहरातून व गावातून पाठविण्यात आले. लाखभर मेल जाऊन मेल आयडी ब्लॉक झाला तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लिंगायत समाज समितीने केला आहे.