शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

मुख्यमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती

By admin | Updated: February 8, 2016 23:56 IST

हसन मुश्रीफ : टोलबाबत अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेवर टांगती तलवार

कोल्हापूर : ‘आयआरबी’ कंपनीने टोलबाबत महापालिका विरोधातील याचिका मागे घेतलेली नाही. त्यांना ही तडजोड मान्य आहे की नाही, त्याचबरोबर कंपनीला अद्याप पैसे न दिल्याने महापालिकेवर टोलची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे टोलचा प्रश्न खऱ्या अर्थाने संपला कोठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी केला. टोलबाबतचे सर्व प्रश्न सोडविले असते तर मुख्यमंत्र्यांसह संबंधित दोन मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी मारला. कोल्हापुरातील टोलबाबत ‘आयआरबी’ कंपनीने महापालिकेवर न्यायालयात दावा केला आहे. राज्य सरकारने जरी कंपनीशी तडजोड करून रक्कम देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप कंपनीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कंपनीने न्यायालयातून याचिका मागे घेतलेली नाही. कंपनीचे पैसे देण्याची केवळ घोषणा केली आहे, पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केली. त्यांनी हे सर्व प्रश्न मार्गी लावले असते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्याचबरोबर निवासराव साळोखे व बाबा पार्र्टे यांचाही जंगी सत्कार केला असता, असेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. विधी आणि न्याय खात्याचा मंत्री असताना न्यायसंकुलाच्या मंजुरीसह प्रत्येक टप्प्यावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला; पण सर्किट बेंचसाठी बार असोसिएशनने बहिष्कार टाकल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. (प्रतिनिधी) टोलचा विषय संपलाच : निवासराव साळोखेकोल्हापूर महानगरपालिकेवर ‘आयआरबी’ कंपनीच्या टांगत्या तलवारीची भीती वाटणाऱ्यांनीच ही तलवार टांगून ठेवली आहे. टोल प्रकरणातील आपले काळं कर्तृत्व दडपण्यासाठीच हसन मुश्रीफ पांढरा प्रयत्न करत आहेत. ‘आयआरबी’ कंपनीशी राज्य सरकारने चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याने टोलचा प्रश्न संपला आहे. मिरवणुकीसाठी वेगळा मुहूर्त कशालाटोल कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय होता, तो दूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगराएवढे काम केले आहे. खिलाडूवृत्तीने ते स्वीकारलेच पाहिजे. टोलविरोधी कृती समितीच्या मागे आहोत, हत्तीवरून मिरवणूक काढली असती, हे हसन मुश्रीफ यांचे वाक्प्रचार गुळगुळीत झाले आहेत. हत्तीवरून मिरवणूक काढायचीच होती, तर वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज काय? असा सवालही निवासराव साळोखे यांनी केला.