शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती

By admin | Updated: February 8, 2016 23:56 IST

हसन मुश्रीफ : टोलबाबत अजूनही कोल्हापूर महानगरपालिकेवर टांगती तलवार

कोल्हापूर : ‘आयआरबी’ कंपनीने टोलबाबत महापालिका विरोधातील याचिका मागे घेतलेली नाही. त्यांना ही तडजोड मान्य आहे की नाही, त्याचबरोबर कंपनीला अद्याप पैसे न दिल्याने महापालिकेवर टोलची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे टोलचा प्रश्न खऱ्या अर्थाने संपला कोठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकारांशी केला. टोलबाबतचे सर्व प्रश्न सोडविले असते तर मुख्यमंत्र्यांसह संबंधित दोन मंत्र्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केल्याचा टोलाही मुश्रीफ यांनी मारला. कोल्हापुरातील टोलबाबत ‘आयआरबी’ कंपनीने महापालिकेवर न्यायालयात दावा केला आहे. राज्य सरकारने जरी कंपनीशी तडजोड करून रक्कम देण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप कंपनीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कंपनीने न्यायालयातून याचिका मागे घेतलेली नाही. कंपनीचे पैसे देण्याची केवळ घोषणा केली आहे, पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार करून घेण्यास जरा गडबड केली. त्यांनी हे सर्व प्रश्न मार्गी लावले असते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली असती. त्याचबरोबर निवासराव साळोखे व बाबा पार्र्टे यांचाही जंगी सत्कार केला असता, असेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. विधी आणि न्याय खात्याचा मंत्री असताना न्यायसंकुलाच्या मंजुरीसह प्रत्येक टप्प्यावर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला; पण सर्किट बेंचसाठी बार असोसिएशनने बहिष्कार टाकल्याने आम्ही उपस्थित राहू शकलो नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. (प्रतिनिधी) टोलचा विषय संपलाच : निवासराव साळोखेकोल्हापूर महानगरपालिकेवर ‘आयआरबी’ कंपनीच्या टांगत्या तलवारीची भीती वाटणाऱ्यांनीच ही तलवार टांगून ठेवली आहे. टोल प्रकरणातील आपले काळं कर्तृत्व दडपण्यासाठीच हसन मुश्रीफ पांढरा प्रयत्न करत आहेत. ‘आयआरबी’ कंपनीशी राज्य सरकारने चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याने टोलचा प्रश्न संपला आहे. मिरवणुकीसाठी वेगळा मुहूर्त कशालाटोल कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय होता, तो दूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगराएवढे काम केले आहे. खिलाडूवृत्तीने ते स्वीकारलेच पाहिजे. टोलविरोधी कृती समितीच्या मागे आहोत, हत्तीवरून मिरवणूक काढली असती, हे हसन मुश्रीफ यांचे वाक्प्रचार गुळगुळीत झाले आहेत. हत्तीवरून मिरवणूक काढायचीच होती, तर वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज काय? असा सवालही निवासराव साळोखे यांनी केला.