शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेतले गोळीबार

By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST

नारायण राणेंनी डागली तोफ : मालवण विकास आराखडा माथी मारू दिला जाणार नाही

मालवण : मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या भागाचा आपण दौरा केल्यानंतर जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौरा केला. मात्र, दुष्काळग्रस्तांना जाहीर झालेली मदत अद्याप पोहचलेली नाही. मुख्यमंत्र्यांची आश्वासने ही केवळ हवेतले गोळीबार आहेत, अशी टीका करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप, सेना सरकावर तोफ डागली. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी मालवण नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, लीलाधर पराडकर, दीपक पाटकर, संतोष आचरेकर, आबा हडकर, संजय लुडबे, राजू परुळेकर आदी यावेळी उपस्थित होते.भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. निष्पाप लहान मुलांचे सोयी सुविधांअभावी जीव जात आहेत. विकासाचे प्रकल्प शासनाने बासनात गुंडाळले की काय, अशी स्थिती आहे. मालवणवासीयांचा प्रखर विरोध होत असलेल्या शहर विकास आराखड्याबाबत भाष्य करताना भाजपकडून गैरसमज पसरवले जात आहेत, असे सांगत नगरविकास खात्यांतर्गत टाऊन प्लॅनिंग तयार केलेल्या या आराखड्यावर अभ्यास करून पालकमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. त्यानंतरच आराखडा प्रसिद्ध झाला असता तर नागरिकांवर अन्याय झालाच नसता. हा आराखडा नगरपालिकेत पुन्हा मांडला जाईल, त्यावेळी काँग्रेस नगरसेवक जनतेला अपेक्षित असा आराखड्यास विरोध करतील. कोणत्याही स्थितीत नागरिकांना उद्ध्वस्त, विस्थापित लेले जाणार नाही. शासन स्तरावर जरी हा आराखडा मंजुरीस गेल्यास आपण स्वत: लक्ष घालून आराखड्यास विरोध करू, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) वाँटेड आमदार आमसभा कशी घेतो ?अनधिकृत वाळू डंपरमध्ये भरताना सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही अटक झाली नाही. अशा वाँटेड आमदाराला पोलीस सभा घेऊच कशी देतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.अन्य धर्मियांवर अन्याय का ?मुंबईत मांसाहार बंदी घातली आहे. याबाबत बोलताना कोणत्याही धर्मासाठी अन्य धर्मियांवर बंधने योग्य नाहीत. भाजपा-शिवसेनेची मंडळी आरोप-प्रत्यारोप करून जणू करमणूकच करत आहेत, असे सांगताना भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय वाद वाढला आहे. जातीय वादातून तेढ निर्माण करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असे राणे म्हणाले.भुयारी गटार निधीबाबत अर्थमंत्र्यांना पत्र पाठवा मालवणच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी भुयारी गटार योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. मात्र, केंद्र्राकडून उर्वरित निधी न मिळाल्याने ही योजना बंद आहे. याबाबत लक्ष वेधले असता अर्थमंत्र्यांना निधीबाबत नगरपरिषदेने पत्रव्यवहार करावा अशा सूचना नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांना केल्या. आपण स्वत: या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले, केंद्राने सर्वच लोकहिताच्या जुन्या योजना बंद केल्या, हेच का ‘अच्छे दिन’, असा टोलाही राणे यांनी लगावला.