शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेतले गोळीबार

By admin | Updated: September 11, 2015 23:41 IST

नारायण राणेंनी डागली तोफ : मालवण विकास आराखडा माथी मारू दिला जाणार नाही

मालवण : मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. या भागाचा आपण दौरा केल्यानंतर जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ दौरा केला. मात्र, दुष्काळग्रस्तांना जाहीर झालेली मदत अद्याप पोहचलेली नाही. मुख्यमंत्र्यांची आश्वासने ही केवळ हवेतले गोळीबार आहेत, अशी टीका करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजप, सेना सरकावर तोफ डागली. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी मालवण नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, लीलाधर पराडकर, दीपक पाटकर, संतोष आचरेकर, आबा हडकर, संजय लुडबे, राजू परुळेकर आदी यावेळी उपस्थित होते.भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. निष्पाप लहान मुलांचे सोयी सुविधांअभावी जीव जात आहेत. विकासाचे प्रकल्प शासनाने बासनात गुंडाळले की काय, अशी स्थिती आहे. मालवणवासीयांचा प्रखर विरोध होत असलेल्या शहर विकास आराखड्याबाबत भाष्य करताना भाजपकडून गैरसमज पसरवले जात आहेत, असे सांगत नगरविकास खात्यांतर्गत टाऊन प्लॅनिंग तयार केलेल्या या आराखड्यावर अभ्यास करून पालकमंत्र्यांनी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. त्यानंतरच आराखडा प्रसिद्ध झाला असता तर नागरिकांवर अन्याय झालाच नसता. हा आराखडा नगरपालिकेत पुन्हा मांडला जाईल, त्यावेळी काँग्रेस नगरसेवक जनतेला अपेक्षित असा आराखड्यास विरोध करतील. कोणत्याही स्थितीत नागरिकांना उद्ध्वस्त, विस्थापित लेले जाणार नाही. शासन स्तरावर जरी हा आराखडा मंजुरीस गेल्यास आपण स्वत: लक्ष घालून आराखड्यास विरोध करू, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) वाँटेड आमदार आमसभा कशी घेतो ?अनधिकृत वाळू डंपरमध्ये भरताना सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यावर चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही अटक झाली नाही. अशा वाँटेड आमदाराला पोलीस सभा घेऊच कशी देतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.अन्य धर्मियांवर अन्याय का ?मुंबईत मांसाहार बंदी घातली आहे. याबाबत बोलताना कोणत्याही धर्मासाठी अन्य धर्मियांवर बंधने योग्य नाहीत. भाजपा-शिवसेनेची मंडळी आरोप-प्रत्यारोप करून जणू करमणूकच करत आहेत, असे सांगताना भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक व जातीय वाद वाढला आहे. जातीय वादातून तेढ निर्माण करणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असे राणे म्हणाले.भुयारी गटार निधीबाबत अर्थमंत्र्यांना पत्र पाठवा मालवणच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी भुयारी गटार योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. मात्र, केंद्र्राकडून उर्वरित निधी न मिळाल्याने ही योजना बंद आहे. याबाबत लक्ष वेधले असता अर्थमंत्र्यांना निधीबाबत नगरपरिषदेने पत्रव्यवहार करावा अशा सूचना नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांना केल्या. आपण स्वत: या प्रकरणी लक्ष घालणार असल्याचे सांगितले, केंद्राने सर्वच लोकहिताच्या जुन्या योजना बंद केल्या, हेच का ‘अच्छे दिन’, असा टोलाही राणे यांनी लगावला.