शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कौशल्य विकासावरच देश महासत्ता : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 20, 2014 23:18 IST

सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत.

कऱ्हाड : ‘देशाकडे नैसर्गिक संपत्ती नसल्याने सुमारे ८५ टक्के कच्चे तेल, कोळसा तसेच अनेक खनिजे आयात करावी लागत आहेत. सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत. देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळ व कौशल्य विकास वाढविणे गरजेचे आहे. तसेच रोजगार वाढविण्यासाठी ‘नॅशनल स्किल डेव्हपमेंट कार्पोरेशन’ची स्थापना करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान व मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नियामक मंडळ सदस्य शहाजीराव जगदाळे, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे गरजेचे आहे. जपानकडे कोणतीही नैसर्गिक संपत्ती नाही. तरीही मनुष्यबळ व कौशल्याच्या विकासावर आज तो देश समृद्ध आहे. आर्थिक ताकद त्यांनी निर्माण केली आहे. इस्त्राइलने मनुष्यबळावरच प्रगती केली आहे. तेथील लोकसंख्या सातारा जिल्ह्याइतकीच म्हणजे ४० लाख आहे. दरडोई उत्पन्न वाढविले तर सर्व समस्या सोडवण्यास मदत होईल. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे गरजेचे आहे. त्याचा राष्ट्र निर्माणासाठी उपयोग होणार आहे. सध्या उच्च शिक्षणाकरिता जादा निधी देऊ शकत नाही. प्राथमिक शिक्षणासाठी ३० हजार कोटींहून अधिक खर्च होत आहे. सध्या देशाला मूलभूत गोष्टीसाठीच जास्ती संघर्ष करावा लागत आहे. यामुळे संशोधनावर जास्तीतच भर देऊन संशोधनावर आधारित नवे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात साक्षरतचे प्रमाणे ८५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतूनच सुमारे ७५ टक्के उत्पन्न महाराष्ट्राला मिळते. यामुळे उत्पादन क्षमता ही वाढविणे गरजेचे आहे.’ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवादमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इंजिनिअर ते राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारला. याला मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतचे सविस्तर उत्तर दिले. तसेच राज्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येबाबत राज्य शासनाची भूमिका विचारण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर असणारी ताण-तणावाची परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले.