शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

कौशल्य विकासावरच देश महासत्ता : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 20, 2014 23:18 IST

सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत.

कऱ्हाड : ‘देशाकडे नैसर्गिक संपत्ती नसल्याने सुमारे ८५ टक्के कच्चे तेल, कोळसा तसेच अनेक खनिजे आयात करावी लागत आहेत. सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत. देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळ व कौशल्य विकास वाढविणे गरजेचे आहे. तसेच रोजगार वाढविण्यासाठी ‘नॅशनल स्किल डेव्हपमेंट कार्पोरेशन’ची स्थापना करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान व मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नियामक मंडळ सदस्य शहाजीराव जगदाळे, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे गरजेचे आहे. जपानकडे कोणतीही नैसर्गिक संपत्ती नाही. तरीही मनुष्यबळ व कौशल्याच्या विकासावर आज तो देश समृद्ध आहे. आर्थिक ताकद त्यांनी निर्माण केली आहे. इस्त्राइलने मनुष्यबळावरच प्रगती केली आहे. तेथील लोकसंख्या सातारा जिल्ह्याइतकीच म्हणजे ४० लाख आहे. दरडोई उत्पन्न वाढविले तर सर्व समस्या सोडवण्यास मदत होईल. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे गरजेचे आहे. त्याचा राष्ट्र निर्माणासाठी उपयोग होणार आहे. सध्या उच्च शिक्षणाकरिता जादा निधी देऊ शकत नाही. प्राथमिक शिक्षणासाठी ३० हजार कोटींहून अधिक खर्च होत आहे. सध्या देशाला मूलभूत गोष्टीसाठीच जास्ती संघर्ष करावा लागत आहे. यामुळे संशोधनावर जास्तीतच भर देऊन संशोधनावर आधारित नवे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात साक्षरतचे प्रमाणे ८५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतूनच सुमारे ७५ टक्के उत्पन्न महाराष्ट्राला मिळते. यामुळे उत्पादन क्षमता ही वाढविणे गरजेचे आहे.’ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवादमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इंजिनिअर ते राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारला. याला मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतचे सविस्तर उत्तर दिले. तसेच राज्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येबाबत राज्य शासनाची भूमिका विचारण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर असणारी ताण-तणावाची परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले.