शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

कौशल्य विकासावरच देश महासत्ता : मुख्यमंत्री

By admin | Updated: July 20, 2014 23:18 IST

सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत.

कऱ्हाड : ‘देशाकडे नैसर्गिक संपत्ती नसल्याने सुमारे ८५ टक्के कच्चे तेल, कोळसा तसेच अनेक खनिजे आयात करावी लागत आहेत. सौदी अरेबिया, चीन, रशिया, अमेरिका यांच्याकडे नैसर्गिंक संपत्ती आहे. त्यामुळे ते प्रगतिपथावर आहेत. देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळ व कौशल्य विकास वाढविणे गरजेचे आहे. तसेच रोजगार वाढविण्यासाठी ‘नॅशनल स्किल डेव्हपमेंट कार्पोरेशन’ची स्थापना करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान व मुलींच्या वसतिगृहाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नियामक मंडळ सदस्य शहाजीराव जगदाळे, आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी रामास्वामी एन., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर, बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘देश आर्थिक महासत्ता होण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे गरजेचे आहे. जपानकडे कोणतीही नैसर्गिक संपत्ती नाही. तरीही मनुष्यबळ व कौशल्याच्या विकासावर आज तो देश समृद्ध आहे. आर्थिक ताकद त्यांनी निर्माण केली आहे. इस्त्राइलने मनुष्यबळावरच प्रगती केली आहे. तेथील लोकसंख्या सातारा जिल्ह्याइतकीच म्हणजे ४० लाख आहे. दरडोई उत्पन्न वाढविले तर सर्व समस्या सोडवण्यास मदत होईल. शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविणे गरजेचे आहे. त्याचा राष्ट्र निर्माणासाठी उपयोग होणार आहे. सध्या उच्च शिक्षणाकरिता जादा निधी देऊ शकत नाही. प्राथमिक शिक्षणासाठी ३० हजार कोटींहून अधिक खर्च होत आहे. सध्या देशाला मूलभूत गोष्टीसाठीच जास्ती संघर्ष करावा लागत आहे. यामुळे संशोधनावर जास्तीतच भर देऊन संशोधनावर आधारित नवे उद्योग निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात साक्षरतचे प्रमाणे ८५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या जिल्ह्यांतूनच सुमारे ७५ टक्के उत्पन्न महाराष्ट्राला मिळते. यामुळे उत्पादन क्षमता ही वाढविणे गरजेचे आहे.’ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवादमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इंजिनिअर ते राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारला. याला मुख्यमंत्र्यांनी प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतचे सविस्तर उत्तर दिले. तसेच राज्यात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्येबाबत राज्य शासनाची भूमिका विचारण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर असणारी ताण-तणावाची परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले.