शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

By admin | Updated: April 30, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासन पंतप्रधानांनी पाळावे

आजरा : विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर ३०२ कलम दाखल करा म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विसरले आहेत. तीच अवस्था पंतप्रधानांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्यावतीने कर्जमुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीच्या निमित्त खा. शेट्टी बोलत होते.खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री उपस्थित करीत आहेत, पण किमान अत्यंत गांजलेल्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा तरी द्यावाच लागेल. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येत आहे. वैश्विक तापमानात झालेली वाढ, निसर्गाची छेड काढून उभारलेली सिमेंटची जंगले, यांच्याशी काहीही संबंध नसताना शेतकरी त्याचे परिणाम भोगत आहे. समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. विविध कारणांनी शेतीमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भरून घेतले आहेत. १२० कोटी जनतेची भूक मिटवण्याकरिता शेतात राबून देशसेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्याला वृद्धापकाळात पेन्शन मिळावी, अशी आपली भूमिका आहे. तसे ठराव येत्या ग्रामसभेत महाराष्ट्राभर केले जाणार आहेत. अद्याप उसाच्या उर्वरित ५०० रुपयांचा प्रश्नही कायम आहे. चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)सदाभाऊ संघटना सोडणार नाहीतराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर आहेत, असे समजल्याबद्दल खा. शेट्टी यांना विचारल्यानंतर सदाभाऊ संघटनेत वाढले आहेत. ते भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षच शेतकऱ्यांच्या बाजूनेकाल शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले, तर सत्तेत असणारे; परंतु सध्या विरोधात असणारे विरोधी पक्ष सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो, अशी टिप्पणीही खा. शेट्टी यांनी केली.