शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

By admin | Updated: April 30, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासन पंतप्रधानांनी पाळावे

आजरा : विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर ३०२ कलम दाखल करा म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विसरले आहेत. तीच अवस्था पंतप्रधानांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्यावतीने कर्जमुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीच्या निमित्त खा. शेट्टी बोलत होते.खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री उपस्थित करीत आहेत, पण किमान अत्यंत गांजलेल्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा तरी द्यावाच लागेल. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येत आहे. वैश्विक तापमानात झालेली वाढ, निसर्गाची छेड काढून उभारलेली सिमेंटची जंगले, यांच्याशी काहीही संबंध नसताना शेतकरी त्याचे परिणाम भोगत आहे. समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. विविध कारणांनी शेतीमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भरून घेतले आहेत. १२० कोटी जनतेची भूक मिटवण्याकरिता शेतात राबून देशसेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्याला वृद्धापकाळात पेन्शन मिळावी, अशी आपली भूमिका आहे. तसे ठराव येत्या ग्रामसभेत महाराष्ट्राभर केले जाणार आहेत. अद्याप उसाच्या उर्वरित ५०० रुपयांचा प्रश्नही कायम आहे. चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)सदाभाऊ संघटना सोडणार नाहीतराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर आहेत, असे समजल्याबद्दल खा. शेट्टी यांना विचारल्यानंतर सदाभाऊ संघटनेत वाढले आहेत. ते भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षच शेतकऱ्यांच्या बाजूनेकाल शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले, तर सत्तेत असणारे; परंतु सध्या विरोधात असणारे विरोधी पक्ष सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो, अशी टिप्पणीही खा. शेट्टी यांनी केली.