शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले : शेट्टी

By admin | Updated: April 30, 2017 01:12 IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : २०१४ च्या निवडणुकीतील आश्वासन पंतप्रधानांनी पाळावे

आजरा : विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर ३०२ कलम दाखल करा म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांना विसरले आहेत. तीच अवस्था पंतप्रधानांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधानांनी दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी आजरा येथे पत्रकार बैठकीत केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्यावतीने कर्जमुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोटारसायकल रॅलीच्या निमित्त खा. शेट्टी बोलत होते.खा. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री उपस्थित करीत आहेत, पण किमान अत्यंत गांजलेल्या परिस्थितीत असणाऱ्या शेतकऱ्याला दिलासा तरी द्यावाच लागेल. सातत्याने शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येत आहे. वैश्विक तापमानात झालेली वाढ, निसर्गाची छेड काढून उभारलेली सिमेंटची जंगले, यांच्याशी काहीही संबंध नसताना शेतकरी त्याचे परिणाम भोगत आहे. समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करू लागला आहे. विविध कारणांनी शेतीमालाचे भाव सातत्याने कोसळत आहेत. महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भरून घेतले आहेत. १२० कोटी जनतेची भूक मिटवण्याकरिता शेतात राबून देशसेवा करणाऱ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे. त्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्याला वृद्धापकाळात पेन्शन मिळावी, अशी आपली भूमिका आहे. तसे ठराव येत्या ग्रामसभेत महाराष्ट्राभर केले जाणार आहेत. अद्याप उसाच्या उर्वरित ५०० रुपयांचा प्रश्नही कायम आहे. चार तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)सदाभाऊ संघटना सोडणार नाहीतराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपच्या वाटेवर आहेत, असे समजल्याबद्दल खा. शेट्टी यांना विचारल्यानंतर सदाभाऊ संघटनेत वाढले आहेत. ते भाजपमध्ये जातील, असे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षच शेतकऱ्यांच्या बाजूनेकाल शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे विरोधी पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना विसरले, तर सत्तेत असणारे; परंतु सध्या विरोधात असणारे विरोधी पक्ष सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षच नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने असतो, अशी टिप्पणीही खा. शेट्टी यांनी केली.