शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट टाळली

By admin | Updated: February 19, 2016 00:23 IST

रिक्टोली ग्रामस्थांचे उपोषण सुरुच : रुग्णालयातून बाहेर पडलेले आंदोलनकर्ते पुन्हा उपोषणस्थळी

चिपळूण : रिक्टोली येथे नळपाणी योजना व्हावी, यासाठी २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहीद शशांक शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह रिक्टोलीचे ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आजही हे आमरण उपोषण सुरुच आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बुधवारी रिक्टोली गावी जाऊन नळपाणी योजनेच्या वस्तुस्थितीची पाहणी केली. मात्र, उपोषणकर्त्यांना न भेटताच परस्पर निघून गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. रिक्टोली ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर मंगळवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह सर्वजण उपोषणस्थळी दाखल झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे प्रताप शिंदे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सभापती स्नेहा मेस्त्री या दुपारपर्यंत उपोषणकर्त्यांबरोबरच होत्या. यावेळी डॉ. पल्लवी कोदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही पर्यायी व्यवस्था मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उपोषणकर्त्यांना हा तोडगा मान्य नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश जंगम, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, विस्तार अधिकारी प्रमोद केळस्कर, पाणी पुरवठा उपअभियंता व्यास व सर्व शाखा अभियंता त्यांच्याबरोबर होते. रिक्टोली गावात सध्या असणाऱ्या योजनेपासून ते अगदी गावातील इतर स्रोतांचीही त्यांनी पाहणी केली. वस्तुस्थितीची पाहणी करताना रिक्टोली - मधलीवाडी येथील माजी सैनिक विधवांनी व महिलांनी देशभ्रतार यांना घेराओ घालून जाब विचारला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. गावातून फेरफटका मारुन आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना न भेटताच रत्नागिरीला जाणे पसंत केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)उपोषणाला राजकीय रंगरिक्टोली गावासाठी २०१३मध्ये मंजूर झालेली नळपाणी योजना मार्गी लागावी म्हणून ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. या योजनेच्या अध्यक्षपदी पूर्वी शहीद शशांक शिंदे यांचे वडील होते. आजही या उपोषणात त्यांच्या मातोश्री सहभागी झाल्या आहेत. शहिदाचे गाव पाण्यापासून उपेक्षित असल्याने या उपोषणाबद्दल जनतेत सहानुभूती आहे. मात्र, गावातील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने या उपोषणाला आता राजकीय रंग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपोषणकर्त्यांबरोबर आहेत, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोधी गटाला पाठिंबा आहे. त्यामुळे ही योजना आता राजकीय साठमारीत सापडली असून प्रशासकीय चाळणीत आली आहे.