शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट टाळली

By admin | Updated: February 19, 2016 00:23 IST

रिक्टोली ग्रामस्थांचे उपोषण सुरुच : रुग्णालयातून बाहेर पडलेले आंदोलनकर्ते पुन्हा उपोषणस्थळी

चिपळूण : रिक्टोली येथे नळपाणी योजना व्हावी, यासाठी २६/११च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहीद शशांक शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह रिक्टोलीचे ग्रामस्थ गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आजही हे आमरण उपोषण सुरुच आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बुधवारी रिक्टोली गावी जाऊन नळपाणी योजनेच्या वस्तुस्थितीची पाहणी केली. मात्र, उपोषणकर्त्यांना न भेटताच परस्पर निघून गेल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. रिक्टोली ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर मंगळवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर लक्ष्मीबाई शिंदे यांच्यासह सर्वजण उपोषणस्थळी दाखल झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शिवसेनेचे प्रताप शिंदे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सभापती स्नेहा मेस्त्री या दुपारपर्यंत उपोषणकर्त्यांबरोबरच होत्या. यावेळी डॉ. पल्लवी कोदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही पर्यायी व्यवस्था मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उपोषणकर्त्यांना हा तोडगा मान्य नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश जंगम, गटविकास अधिकारी शुभांगी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, विस्तार अधिकारी प्रमोद केळस्कर, पाणी पुरवठा उपअभियंता व्यास व सर्व शाखा अभियंता त्यांच्याबरोबर होते. रिक्टोली गावात सध्या असणाऱ्या योजनेपासून ते अगदी गावातील इतर स्रोतांचीही त्यांनी पाहणी केली. वस्तुस्थितीची पाहणी करताना रिक्टोली - मधलीवाडी येथील माजी सैनिक विधवांनी व महिलांनी देशभ्रतार यांना घेराओ घालून जाब विचारला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. गावातून फेरफटका मारुन आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना न भेटताच रत्नागिरीला जाणे पसंत केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)उपोषणाला राजकीय रंगरिक्टोली गावासाठी २०१३मध्ये मंजूर झालेली नळपाणी योजना मार्गी लागावी म्हणून ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. या योजनेच्या अध्यक्षपदी पूर्वी शहीद शशांक शिंदे यांचे वडील होते. आजही या उपोषणात त्यांच्या मातोश्री सहभागी झाल्या आहेत. शहिदाचे गाव पाण्यापासून उपेक्षित असल्याने या उपोषणाबद्दल जनतेत सहानुभूती आहे. मात्र, गावातील विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने या उपोषणाला आता राजकीय रंग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी उपोषणकर्त्यांबरोबर आहेत, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोधी गटाला पाठिंबा आहे. त्यामुळे ही योजना आता राजकीय साठमारीत सापडली असून प्रशासकीय चाळणीत आली आहे.