शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 01:30 IST

देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र देवेंद्र फडणवीस : विकास निधीच्या मंजुरीचे संभाजीराजे यांना पत्र

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाची स्थापना छत्रपती राजाराम महाराज यांनी केली आहे. त्यामुळे या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १९) मुंबईत दिले. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार कोल्हापूर विमानतळ विकास आराखड्याच्या खर्चापैकी निर्धारित निधी राज्य शासन देणार असल्याचे पत्र त्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे दिले.कोल्हापूर विमानतळाचा विकास, सेवा प्रारंभाबाबत चर्चेसाठी दिल्लीमध्ये मंगळवारी (दि. १८) भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे बैठक घेण्यात आली. यात प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी कोल्हापूरचा विमानतळ कार्यरत नसल्याने विकास आराखड्यातील एकूण खर्चाच्या ३० टक्के रकमेचा भार राज्य सरकारने उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचा वाटा उचलण्याची लेखी विनंती केली. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद देत विमानतळासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याच्या निधीला तत्त्वत: मंजुरी दिली. शिवाय त्यांनी भारतीय विमान प्राधिकरणाला आम्ही हिस्सा उचलण्यास तयार असल्याचे कळविले. या संदर्भातील लेखी पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिले. (प्रतिनिधी)ठोस कार्यवाहीचे पाऊल याशिवाय विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाच्या २७४ कोटी रुपयांपैकी राज्य शासनाच्या हिश्श्याची २० टक्के रक्कम देण्याचे पत्र दिले आहे. निधी देण्याबाबतचे अधिकृत पत्र मिळाल्यामुळे विमानतळ विकास व सेवा सुरू करण्याच्या दिशेने ठोस कार्यवाहीचे पाऊल पडले असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या करवीरनगरीच्या विकासासाठी निधी कदापि कमी पडू न देण्याचे व यासाठी अजूनही निधी लागला, तर तो दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे तातडीने परवाना मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहेमुंबईत बुधवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अपेक्षेनुसार विमानतळ विकास आराखड्यातील खर्चाची रक्कम राज्य शासनाने द्यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले.