शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कर्जमाफीच्या अर्जांची आजपासून तपासणी--जिल्हाधिकाºयांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त सहभागी झालेल्या शेतकºयांची विकास संस्था व जिल्हा बँकेने वाटप केलेल्या कर्जाच्या माहितीची तपासणी आज, गुरुवारपासून शासकीय लेखापरीक्षकांकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान व्हावे, असे आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.‘छत्रपती ...

ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्याच्या आज शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त सहभागी झालेल्या शेतकºयांची विकास संस्था व जिल्हा बँकेने वाटप केलेल्या कर्जाच्या माहितीची तपासणी आज, गुरुवारपासून शासकीय लेखापरीक्षकांकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गतिमान व्हावे, असे आदेश गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले.

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’संदर्भात शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, आदींची होती.

राज्य सरकारने कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले असून, कोल्हापूर विभागातून ८ लाख ५६ हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. यानंतर लगेचच अर्जांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी दिले.

जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी या तपासणीसाठी ८३ शासकीय लेखापरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचे सांगितले. हे लेखापरीक्षक विकास संस्था व जिल्हा बँकेतील रेकॉर्डनुसार शेतकºयांची खाती तपासून त्याची विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. ही महिती ते माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या लिंकद्वारे थेट अपलोड करतील. त्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील लेखापरीक्षक, जिल्हा बॅँकेचा विकास अधिकारी, उपसहायक निबंधक यांची समिती तपासणी करून आॅनलाईनद्वारे ही माहिती सहकार आयुक्तांकडे पाठविणार आहे. या सर्व कार्यवाहीवर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक, जिल्हा लेखापरीक्षक ही समिती लक्ष ठेवणार आहे, असे सांगितले.

जिल्'ातून ३ लाख २३ हजार अर्जकर्जमाफीसाठी आतापर्यंत जिल्'ातून जिल्हा बॅँकेसह राष्टÑीय बॅँकेच्या माध्यमातून अंदाजे ३ लाख २३ हजार ८२३ आॅनलाईन अर्ज आले आहेत.