शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

जयसिंगपूरच्या सत्तेसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By admin | Updated: April 25, 2016 01:01 IST

भाजपची स्वबळासाठी तयारी : सत्ताधाऱ्यांचे विकासकामाकडे लक्ष; श्रेयवादासाठी चढाओढ

संदीप बावचे -- जयसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे़ सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे़ भाजपने मेळावा घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, तर शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी सर्वच विरोधकांना घेऊन मोट बांधत आहे. त्यातच जयसिंगपूर-वाडी रस्त्यावरून सत्ताधारी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगल्याने शहरातील राजकीय वातावरण आत्तापासूनच तापू लागल्यामुळे २०१६ ची निवडणूक चांगलीच गाजणार आहे़ सांस्कृतिक आणि शिक्षणाची पंढरी म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे़ शासनाच्या योजना प्रभावीपणे शहरात राबविल्या जातात़ पालिकेचे शताब्दी वर्ष असल्यामुळे सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने येणाऱ्या वर्षभरात शहरात शंभर कोटी रुपयांची विकासकामे राबविण्याचा संकल्प केला आहे़ वातानुकूलित नाट्यगृह, २४ तास पाणी, भुयारी गटार यासह अनेक योजना राबविण्याचे उद्दिष्ट सत्ताधाऱ्यांनी हाती घेतले आहे़ गतवेळी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व मित्र पक्षाने लढा दिला़ मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली़ गेल्या पाच वर्षांत विरोधी नगरसेवक नसल्याने पालिकेत एकहाती सत्तेतून विकासकामे सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत़ याचाच परिणाम येत्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच शिरोळ, जयसिंगपूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला़ काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर टीका करून स्वबळावर जयसिंगपूरची निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ जयसिंगपूर-वाडी रस्ता पालिकेकडे हस्तांतरण मंजुरीवरून भाजप व सत्ताधारीमध्ये या कामाचा चांगलाच श्रेयवाद जुंपला असतानाच आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून कन्यागत महापर्वकाळाच्या निधीतून प्रत्यक्ष रस्ता झाल्याने जयसिंगपूर-वाडी रस्ता हस्तांतरणाच्या श्रेयवादाला तूर्ततरी ब्रेक मिळाला आहे़ येणाऱ्या काळात भाजप व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ महाडिक गटाकडूनही राजकीय डावपेच सुरू झाले आहेत़ खासदार, आमदारांची भूमिकाखासदार राजू शेट्टी व आमदार उल्हास पाटील जयसिंगपूर निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडेही शहरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे़ केडीसीसी निवडणुकीत यड्रावकर यांना ‘स्वाभिमानी’ने मदत केली होती़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानीकडून भाजपवर टीका केली जात आहे़ मित्रपक्ष असणारा स्वाभिमानी पक्ष जयसिंगपूर पालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार? की स्वतंत्र निवडणूक लढविणार तसेच शिवसेनाही स्वतंत्र निवडणूक लढणार का? हा देखील चर्चचा विषय आहे़