शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

जयसिंगपूरच्या सत्तेसाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By admin | Updated: April 25, 2016 01:01 IST

भाजपची स्वबळासाठी तयारी : सत्ताधाऱ्यांचे विकासकामाकडे लक्ष; श्रेयवादासाठी चढाओढ

संदीप बावचे -- जयसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे़ सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे़ भाजपने मेळावा घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, तर शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी सर्वच विरोधकांना घेऊन मोट बांधत आहे. त्यातच जयसिंगपूर-वाडी रस्त्यावरून सत्ताधारी व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगल्याने शहरातील राजकीय वातावरण आत्तापासूनच तापू लागल्यामुळे २०१६ ची निवडणूक चांगलीच गाजणार आहे़ सांस्कृतिक आणि शिक्षणाची पंढरी म्हणून जयसिंगपूर शहराची ओळख आहे़ शासनाच्या योजना प्रभावीपणे शहरात राबविल्या जातात़ पालिकेचे शताब्दी वर्ष असल्यामुळे सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने येणाऱ्या वर्षभरात शहरात शंभर कोटी रुपयांची विकासकामे राबविण्याचा संकल्प केला आहे़ वातानुकूलित नाट्यगृह, २४ तास पाणी, भुयारी गटार यासह अनेक योजना राबविण्याचे उद्दिष्ट सत्ताधाऱ्यांनी हाती घेतले आहे़ गतवेळी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप व मित्र पक्षाने लढा दिला़ मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली़ गेल्या पाच वर्षांत विरोधी नगरसेवक नसल्याने पालिकेत एकहाती सत्तेतून विकासकामे सुरू आहेत़ विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत़ याचाच परिणाम येत्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसणार आहे़ आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच शिरोळ, जयसिंगपूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला़ काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर टीका करून स्वबळावर जयसिंगपूरची निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ जयसिंगपूर-वाडी रस्ता पालिकेकडे हस्तांतरण मंजुरीवरून भाजप व सत्ताधारीमध्ये या कामाचा चांगलाच श्रेयवाद जुंपला असतानाच आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून कन्यागत महापर्वकाळाच्या निधीतून प्रत्यक्ष रस्ता झाल्याने जयसिंगपूर-वाडी रस्ता हस्तांतरणाच्या श्रेयवादाला तूर्ततरी ब्रेक मिळाला आहे़ येणाऱ्या काळात भाजप व सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ महाडिक गटाकडूनही राजकीय डावपेच सुरू झाले आहेत़ खासदार, आमदारांची भूमिकाखासदार राजू शेट्टी व आमदार उल्हास पाटील जयसिंगपूर निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडेही शहरातील राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे़ केडीसीसी निवडणुकीत यड्रावकर यांना ‘स्वाभिमानी’ने मदत केली होती़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानीकडून भाजपवर टीका केली जात आहे़ मित्रपक्ष असणारा स्वाभिमानी पक्ष जयसिंगपूर पालिका निवडणुकीत भाजपसोबत जाणार? की स्वतंत्र निवडणूक लढविणार तसेच शिवसेनाही स्वतंत्र निवडणूक लढणार का? हा देखील चर्चचा विषय आहे़