शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

घटना बदलून शासनाला मनुस्मृती आणायची आहे?

By admin | Updated: March 3, 2015 00:33 IST

बी. जी. कोळसे-पाटील : बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारणे अपरिहार्य

सांगली : धर्मांतरबंदीचा कायदा आणण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारची सध्याची धोरणे पाहता त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना बदलून मनुस्मृती आणायची आहे का? असा प्रश्न माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत उपस्थित केला. लोकशासन आंदोलनाच्या निमित्ताने ते सांगलीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कोळसे-पाटील म्हणाले की, कॉँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कोणतीच ठाम भूमिका घेतली नाही. त्यांनी सगळ्यांनाच गोंजारण्याचे काम केले. त्यामुळेच आताचे पात्रनसलेले सरकार देशाला मिळाले आहे. पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांना निवडणुकीस कोणी उभे केले, हेच कॉँग्रेसला समजले नाही. भांडवलदारांच्या खांद्यावरच मोदी उभे आहेत व त्यांच्या सोयीचेच निर्णय घेत आहेत. त्याचा प्रत्यय अर्थसंकल्पातून आला आहे. सध्या काही महिन्यांपासून महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण सुरू आहे. घटनेने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य दिले आहे, असे असतानाही धर्मांतरबंदी कायदा आणण्याची शासनाची इच्छा आहे. म्हणजे शासनाला घटनेत बदल करून मनुस्मृती आणण्यात स्वारस्य आहे, असेच वाटते. शब्दप्रामाण्यवादात अडकून न पडता आपण बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार करणे अपेक्षित आहे. तसा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांची हत्या केली जाते. हल्लेखोर अद्यापही मोकाट आहेत. कदाचित भविष्यात हल्लेखोरांना अटक करण्यात येईल; परंतु यामागे ज्यांचा मेंदू आहे त्यांना पकडणे आवश्यक आहे; परंतु तो मेंदू असणाऱ्यांच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, हाच खरा प्रश्न आहे. विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे, हे देखील आपल्या लक्षात येत नाही. मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असताना कोणताही राजकीय पक्ष तशा पद्धतीचे प्रयत्न करीत नसल्याचेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दारिद्र्यरेषेच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी आम्हाला इतर ठिकाणांहून येथे यावे लागते. हे कशाचे लक्षण आहे? सांगली जिल्ह्यात कोणी सामान्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करणार का निर्माण होत नाही? तुमच्या जिल्ह्याची संस्कृती काय? याची तरी जाण ठेवा, असे आवाहनही कोळसे-पाटील यांनी केले.