शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कायापालट योजना प्राधान्याने मांडणार

By admin | Updated: October 27, 2015 00:06 IST

पंकजा मुंडे : विकास परिषदेत होणार योजनेचा प्रसार; ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक

कोल्हापूर : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी कायापालट योजना अत्यंत प्रभावी आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी विविध जिल्ह्यांमधून राबविण्यात येणारे अभिनव प्रयोग, योजना यांचे आदान-प्रदान होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विकास परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कायापालट योजना प्राधान्याने मांडली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे केले.गोकुळ शिरगाव येथील ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक झाली. बैठकीत बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम, कायापालट योजना, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रयत्न, जलयुक्त शिवार योजना, आदींचा सूक्ष्म आढावा घेऊन पंकजा मुंडे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान चांगले आहे. सिंचनाच्या व्यवस्था चांगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कोल्हापूर जिल्ह्याने वेगळा प्रस्ताव तयार करावा. जलयुक्त शिवार या योजनेंतर्गतच विशेष प्रस्ताव म्हणून याला मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३०० किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यासाठी ६९ लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. यावर राज्यभरातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याचा विचार आपल्या विभागामार्फत सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या लक्ष्मी आली घरा, चिरायू योजना, लक्ष्मीचे पाऊल, सासू-सून मेळावा, आदी वैविध्यपूर्ण योजनांची तसेच नॅशनल अ‍ॅ़क्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअरचे मानांकन मिळविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. या योजनांबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर, बसवराज मास्तोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)‘कायापालट’मुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण बदलकायापालट योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेत व सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण बदल झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या प्रसूतींची संख्या वाढली आहे. १० लाख ५३ हजार बाह्य, तर ७३ हजार ९०६ आंतररुग्णांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांकडून उपचार घेतले आहेत.हा लक्षणीय बदल कायापालट योजनेमुळे झाला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी व तळागाळातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.