शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कायापालट योजना प्राधान्याने मांडणार

By admin | Updated: October 27, 2015 00:06 IST

पंकजा मुंडे : विकास परिषदेत होणार योजनेचा प्रसार; ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक

कोल्हापूर : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा कायापालट करून ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी कायापालट योजना अत्यंत प्रभावी आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी विविध जिल्ह्यांमधून राबविण्यात येणारे अभिनव प्रयोग, योजना यांचे आदान-प्रदान होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विकास परिषदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कायापालट योजना प्राधान्याने मांडली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी येथे केले.गोकुळ शिरगाव येथील ‘गोशिमा’च्या सभागृहात विविध विभागांची आढावा बैठक झाली. बैठकीत बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रम, कायापालट योजना, पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीचे प्रयत्न, जलयुक्त शिवार योजना, आदींचा सूक्ष्म आढावा घेऊन पंकजा मुंडे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान चांगले आहे. सिंचनाच्या व्यवस्था चांगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कोल्हापूर जिल्ह्याने वेगळा प्रस्ताव तयार करावा. जलयुक्त शिवार या योजनेंतर्गतच विशेष प्रस्ताव म्हणून याला मान्यता देण्यात येईल. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३०० किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यासाठी ६९ लाखांचा निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले. यावर राज्यभरातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्याचा विचार आपल्या विभागामार्फत सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या लक्ष्मी आली घरा, चिरायू योजना, लक्ष्मीचे पाऊल, सासू-सून मेळावा, आदी वैविध्यपूर्ण योजनांची तसेच नॅशनल अ‍ॅ़क्रिडेशन बोर्ड आॅफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअरचे मानांकन मिळविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. या योजनांबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिवाजी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एस. आडकेकर, बसवराज मास्तोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)‘कायापालट’मुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण बदलकायापालट योजनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेत व सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण बदल झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या प्रसूतींची संख्या वाढली आहे. १० लाख ५३ हजार बाह्य, तर ७३ हजार ९०६ आंतररुग्णांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांकडून उपचार घेतले आहेत.हा लक्षणीय बदल कायापालट योजनेमुळे झाला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमधूनही ही योजना प्रभावीपणे राबविली जावी व तळागाळातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.