शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जिल्हा परिषदेत बदल्यांची झुंबड

By admin | Updated: May 13, 2017 00:14 IST

जिल्हा परिषदेत बदल्यांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील चार विभागांच्या ‘वर्ग-३’ व ‘४’च्या १२० कर्मचाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. बदल्यांच्या प्रक्रियेमुळे तिसऱ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांची झुंबड उडाली होती. आज, शनिवारीही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या न्यायालयाच्या स्थगितीमुळे करण्यात आल्या नाहीत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार १५ मेपर्यंत या बदल्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार समिती सभागृहामध्ये या प्रक्रियेबाबतची तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अध्यक्षा शौमिका महाडिक आणि उपाध्यक्ष सर्जेराव पाटील कळेकर हे दिवसभर या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यावेळी उपस्थित होते. प्रशासन विभागाच्या १५ प्रशासकीय व ४० विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या ४ प्रशासकीय व ४९ विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. वित्त विभागाच्या ५ तर कृषि विभागाची एकही बदली झालेली नाही. बांधकाम विभागाच्या एकूण ७ बदल्या झाल्या आहेत. अशा एकूण १२० बदल्या झाल्या आहेत. सभागृहात संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांना कुठले गाव अपेक्षित आहे याबाबत विचारणा होत होती. यानंतर संबंधितांच्या विनंतीनुसार बदलीचे ठिकाण निश्चित करण्यात येत होते. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या असल्याने तिसऱ्या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातून इच्छुक ग्रामसेवक व वरिष्ठ, कनिष्ठ सहाय्यकांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली.यांना बदल्यातून मिळते सूटप्रत्यक्षात त्या-त्या विभागांना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही ९ प्रकारच्या निकषांमध्ये बसत असलेल्या कर्मचाऱ्यांना बदल्यांतून सूट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बदल्या कमी होतात. पक्षघात, हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार, अपंग, ५३ वर्षांवरील कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, कुमारिका, कॅन्सरग्रस्त आणि आजी-माजी सैनिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येते.