शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत बदल्यांची झुंबड

By admin | Updated: May 13, 2017 00:14 IST

जिल्हा परिषदेत बदल्यांची झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्हा परिषदेतील चार विभागांच्या ‘वर्ग-३’ व ‘४’च्या १२० कर्मचाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. बदल्यांच्या प्रक्रियेमुळे तिसऱ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांची झुंबड उडाली होती. आज, शनिवारीही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या न्यायालयाच्या स्थगितीमुळे करण्यात आल्या नाहीत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार १५ मेपर्यंत या बदल्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार समिती सभागृहामध्ये या प्रक्रियेबाबतची तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अध्यक्षा शौमिका महाडिक आणि उपाध्यक्ष सर्जेराव पाटील कळेकर हे दिवसभर या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, जिल्हा कृषि अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरूड यावेळी उपस्थित होते. प्रशासन विभागाच्या १५ प्रशासकीय व ४० विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या ४ प्रशासकीय व ४९ विनंती व आपसी बदल्या झाल्या आहेत. वित्त विभागाच्या ५ तर कृषि विभागाची एकही बदली झालेली नाही. बांधकाम विभागाच्या एकूण ७ बदल्या झाल्या आहेत. अशा एकूण १२० बदल्या झाल्या आहेत. सभागृहात संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावल्यानंतर त्यांना स्क्रीनवर रिक्त जागा दाखविण्यात येत होत्या. त्यांना कुठले गाव अपेक्षित आहे याबाबत विचारणा होत होती. यानंतर संबंधितांच्या विनंतीनुसार बदलीचे ठिकाण निश्चित करण्यात येत होते. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या असल्याने तिसऱ्या मजल्यावर मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातून इच्छुक ग्रामसेवक व वरिष्ठ, कनिष्ठ सहाय्यकांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली.यांना बदल्यातून मिळते सूटप्रत्यक्षात त्या-त्या विभागांना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असली तरीही ९ प्रकारच्या निकषांमध्ये बसत असलेल्या कर्मचाऱ्यांना बदल्यांतून सूट आहे. त्यामुळे प्रत्यक्षात बदल्या कमी होतात. पक्षघात, हृदयशस्त्रक्रिया, मूत्रपिंड विकार, अपंग, ५३ वर्षांवरील कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, कुमारिका, कॅन्सरग्रस्त आणि आजी-माजी सैनिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येते.