शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समाज को बदल डालो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:28 IST

समाज को बदल डालो! या नावाचे दोन हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत. समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथांवर भाष्य करीत समाजात बदल करणे किंवा काळानुरुप बदल स्वीकारणे कसे गरजेचे आहे यावर हे चित्रपट भाष्य करतात. यातील पहिला चित्रपट १९४७ चा, तर दुसरा १९७० सालातला आहे. आजही समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथा ...

समाज को बदल डालो! या नावाचे दोन हिंदी चित्रपट येऊन गेले आहेत. समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथांवर भाष्य करीत समाजात बदल करणे किंवा काळानुरुप बदल स्वीकारणे कसे गरजेचे आहे यावर हे चित्रपट भाष्य करतात. यातील पहिला चित्रपट १९४७ चा, तर दुसरा १९७० सालातला आहे. आजही समाजातील अनिष्ट चालीरीती आणि कुप्रथा पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. अनेक जाती-जमाती परंपरेच्या आणि आम्हीच श्रेष्ठ अशा वृथा विचारांच्या जोखडात अडकून पडल्या आहेत. भारतात विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. हा जगभरातील इतर देशांसाठी कौतुकाचा विषय आहे. आपली धर्मनिरपेक्षता हाही अभिमानाचा विषय आहे. अठरापगड जातींचा आपला समाज. या समाजातील प्रत्येक जातीधर्माचे सण, समारंभ, त्यांच्या चालीरीती, प्रथा-परंपरा वेगळ्या आहेत. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या प्रथा-परंपरांचे पालन केले जात असले तरी त्यातील काही अनिष्टही आहेत. देवदासीसारख्या प्रथेचा त्यामध्ये समावेश होतो. ती नाहीशी करण्यासाठीची मोहीम सुरू होऊन अनेक वर्षे उलटली तरी आजही ग्रामीणच काय शहरी भागातही ही प्रथा चालू असल्याचे दिसते. सध्याचे युग हे कलियुग आहे असे म्हटले जाते. त्यामुळेच समाजात सत्याचा अंश कमी आणि असत्याचा जादा आहे, असा काही लोकांचा समज आहे. तरीही समाजात जो चांगुलपणा टिकून आहे तो अशा सत्यवचनी आणि प्रामाणिक लोकांमुळेच असेही म्हटले जाते. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत प्रामाणिक लोकांना टिकू दिले जात नाही, हेही तितकेच खरे. तरीही हे लोक सत्याची कास सोडत नाहीत. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न ते करीत असतात. समाजातील सर्वच जाती-जमाती किंवा धर्माचे लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकाच स्तरावर नाहीत. यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जाती-जमातींच्या उथ्थानासाठी भारत सरकारने आरक्षणासह विविध सोयी, सवलतींची तरतूद केलेली आहे. त्याचा लाभ या जाती-धर्मातील अनेकांना झाला आहे. त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर सुधारला आहे; पण याचे प्रमाण आजही कमीच आहे. सरकारकडून दिल्या जाणाºया या सोयी, सवलती प्रगत समजल्या जाणाºया जातींना मिळत नाहीत. यात महाराष्ट्रात बहुसंख्याक असलेल्या मराठा समाजाचाही समावेश आहे. बहुसंख्य मराठी बांधवांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तो बेभरवशाचा आहे. यामुळे या शेतकºयांचा आर्थिकस्तर खालावलेलाच राहतो आहे. नोकºया मिळत नाहीत. महागडे शिक्षण घेण्याची ऐपत नाही, यासारख्या विविध कारणांनी या समाजाची प्रगती खुंटली आहे की काय असे म्हणण्यासारखी परिस्थिती झाल्यानेच हा समाज गेल्या वर्षभरापासून आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मूकमोर्चे काढतो आहे. निशब्द हुुंकार देत राज्य सरकारला धक्के देत आहे. मुंबईत ५८वा मराठा क्रांती मोर्चा बुधवारी झाला. लाखो मराठा बांधवांनी त्याला हजेरी लावून आपली ताकद दाखवून दिली. मागण्या मान्य न झाल्यास यापुढे निशब्द राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. सरकारने मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य केल्याची घोषणा केली आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यास या समाजातील तरुणांनाही संधी उपलब्ध होतील. तरीही स्पर्धेच्या या युगात टिकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. जसे हे आंदोलन झाले तसेच आंदोलन भ्रष्टाचार आणि अनितीविरुद्धही झाले तर समाज सुधारण्यास आणि सर्वांनाच योग्यतेप्रमाणे संधी मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. केवळ नेत्यांनी घोषणा करून काही होणार नाही. ‘स्वच्छ भारत अभियान’चे काय होतंय ते दिसतेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:पासून याची सुरुवात केली तर जसे मराठा क्रांती मोर्चे यशस्वी झाले तसे ‘भ्रष्टाचारी समाज को बदल डालो’ आंदोलनही यशस्वी होईल- चंद्रकांत कित्तुरे