शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कार्यपद्धती बदला; अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:34 IST

कोल्हापूर : राजकीय कार्यपद्धती बदला, अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश ...

कोल्हापूर : राजकीय कार्यपद्धती बदला, अन्यथा २०१४ सारखी वेळ येईल, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना मंगळवारी दिला. महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर लढण्याचे क्षीरसागर यांनी प्रथम जाहीर केले असल्याचे वक्तव्य कसबा बावडा येथील सभेत पालकमंत्र्यांनी केल्याने क्षीरसागर संतप्त झाले आहेत.

पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादीने प्रथम ८१ जागा लढविण्याची घोषणा केली. यानंतर काँग्रेसने हीच भूमिका घेतली. मग शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षाने आम्ही कुठे कमी नाही, या दृष्टिकोनातून स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. मंत्री पाटील २०१७ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले. यावेळी शिवसेनेने त्यांना मदत केली. मात्र, विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आम्हांला धोका दिला. शिवसेना शहरात कमजोर असल्याचे भासवून महापालिकेत जादा जागा द्याव्या लागू नयेत, या हेतूने पालकमंत्री पाटील यांनी स्वबळाची भूमिका घेतली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादीला राजकीय टेकओव्हर करण्याचा त्यांचा डाव आहे.

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळेच पालकमंत्री पाटील प्रथम निवडून आले. शिवसेनेचे हाताचे बोट धरून प्रथम विधानसभेत गेले हे ते आज विसरले आहेत. शिवसेनेने त्यांना मदत करूनही त्यांनी आमच्यावर अन्याय केला आहे. सामान्य नागरिकांची कामे करतो, आपल्या पाठीशी कोणीही नाही म्हणून आपल्यावर काहीही खापर फोडू नये, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

दिवस बदलतात...

महाडिक कुटुंबामध्ये २०१४ ला सर्व सत्ता होती. त्यावेळी तुमच्याकडे काहीच नव्हते. आता तुम्ही पालकमंत्री आहात, पुतण्या आमदार आहे. यावरून राजकीय स्थिती कायम राहत नाही, हे लक्षात घ्या, असेही क्षीरसागर यांनी म्हटले आहे.