शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मोदामृत उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू  : चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 14:42 IST

भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देमोदामृत उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू  : चंद्रकांत पाटील  विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयाचे उदघाटन

कोल्हापूर : भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.विश्वपंढरी येथे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, आनंदनाथ महाराज, रामराया सांगवडेकर, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर उपस्थित होते.

विश्वपंढरी येथे बुधवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कैलास काटकर, आमदार सतेज पाटील, आनंदनाथ महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माणिक पाटील चुयेकर, आमदार सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)मंत्री पाटील म्हणाले, लोक राजकारण्यांपेक्षा महाराजांचे म्हणणे ऐकतात त्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग गरीब रुग्णांसाठी करणारे मठ आणि संस्थांना मजबूत केले पाहीजे. बालपणातच मुलांचे व्यवस्थित पोषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या मोदामृतचा प्रयोग आपण शहरातील २५ झोपडपट्टयांमधील ५०० मुलांवर करू. त्याचा चांगला परिणाम दिसला तर जूननंतर १ लाख मुलांपर्यंत ते पोहोचवले जाईल.आमदार सतेज पाटील म्हणाले,आजाराचे योग्य निदान आणि उपचार ही माणसाची गरज आहे. जिथे सगळे उपचार संपतात तिथे आयुर्वेदाचा दरवाजा उघडतो. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या कुपोषणग्रस्त भागांमधील मुलांना मोदामृतसारखी उपचार पद्धती देता येईल का याचा विचार व्हावा. आमदार सुजित मिणचेकर यांनीही आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा शासनाने प्रचार व प्रसार करावा असे आवाहन केले.यावेळी आनंदनाथ महाराज, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. राहूल शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पानकर यांनी केंद्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. परेश देशमुख यांनी सुत्रसंचलन केले.

राजकारणात ठरवून अपघातयावेळी आमदार सतेज पाटील यांनी आम्हा राजकारणी मंडळींना अनेक ताणतणाव आणि धकाधकीला सामोरे जावे लागते त्यामुळे आमच्यासाठी काही उपचार पद्धती सांगा असे सांगितले, हा धागा पकडत मंत्री पाटील म्हणाले, राजकारणात ठरवून अपघात केले जातात. राजकीय मंडळींना सकारात्मक विचारांचे इंजेक्शन द्या. आचारसंहितेच्या ४५ दिवसात एकमेकांवर वाट्टेल ते आरोप कररूया, पण निवडणूक संपली की सगळं विसरून एकमेकांना मदत केले पाहीजे असे इंजेक्शन आणि सॉफ्टवेअर तयार करा. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय