शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शैक्षणिक बदलांचा वेध घेणार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:58 IST

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे. बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन शैक्षणिक बदलांचा वेध घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केले.संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संस्थेच्या विविध शाखांना भेटी देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे अभ्यासक्रम, भौतिक सुविधा, आदींबाबत चर्चा करणार आहे. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे शाखांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.या सभेच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महेश हिरेमठ यांनी संस्थेची प्रार्थना, भक्तिगीते सादर केली. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. यावेळी संस्थेचे सहसचिव प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, माजी प्राचार्य पी. यू. शेठ यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष संपतराव जेधे, अविनाश पाटील, जी. पी. काका पाटील, शाहीर कुंतीनाथ करके, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, आदी उपस्थित होते. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले.शिक्षणात नवे बदल घडवताहेतअनेक शाळा, महाविद्यालये निर्माण करून विवेकानंद शिक्षण संस्था शैक्षणिक प्रगतिपथावर उभी राहिली. बापूजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ही संस्था नवे अभ्यासक्रम, शैक्षणिक धोरणे राबवून शिक्षणात नवे बदल घडवत असते, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.