शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

चंद्रकांतदादांना ६ जूनला घराबाहेर सोडणार नाही

By admin | Updated: May 16, 2015 00:04 IST

मुश्रीफ यांचा इशारा : एफआरपीचे पॅकेज ३१ मे पर्यंत देण्याची मागणी

कोल्हापूर : महिना उलटला तरी दोन हजार कोटी पॅकेजमधील एक दमडीही कारखान्यांच्या हातात नाही. परिणामी दोन-अडीच महिने शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देता आलेले नाहीत. कर्जांची परतफेड न झाल्याने खरिपासाठी कर्ज मंजूर होईना. तरीही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर शेतकरी रस्त्यावर येईल. मे महिन्याअखेर पॅकेज कारखान्यांना दिले नाही तर ६ जूनला २० हजार शेतकरी पालकमंत्र्यांना घेराव घालून त्यांना घराबाहेर सोडणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. राज्य शासनाच्या पॅकेजबाबत शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यामध्ये आमदार मुश्रीफ यांनी मंत्री पाटील यांना चांगलेच कोंडीत पडले. दोन हजार कोटी सरकारच्या तिजोरीतून देण्याची घोषणा केली, त्याचे काय झाले? असा सवाल करीत आमदार मुश्रीफ यांनी बैठकीची सुरुवात केली. पीककर्जाची परतफेडीसाठी महिना राहिलेला आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वी गाळप झालेल्या उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत. आम्ही ‘एफआरपी’प्रमाणे पैसे दिले, हे चुकले काय? कामगारांचे पगार, तोडणी बिले, व्यापाऱ्यांची देणी द्यायची आहेत. एक रुपयाची मशिनरी घेण्याची आमची लायकी राहिली नसल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले. सरकारने ऊसखरेदी कर माफ, कच्ची साखर निर्यात अनुदान असे निर्णय घेतले आहेत. १९ मेच्या मंत्रिमंडळ बैठकीत पॅकेजबाबत निर्णय होईल, असे पाटील यांनी सांगितले. सरकारने ८७० कोटींचा खरेदी कर माफ केला, केंद्राने चार हजार रुपये टनाला निर्यात अनुदान दिले. राज्य सरकारने एक हजार रुपये घोषणा केली, सहवीज निर्मिती प्रकल्पाची प्रलंबित बिले अदा केली. एवढे करूनही काहीच केले नाही म्हणणे चुकीचे आहे. साखर उद्योगावर संकट आल्याने सगळ्यांनी मिळून मार्ग काढला पाहिजे. नुसते सरकारवर खापर फोडणे योग्य नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. भाजपचा पोरकटपणा...ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार दर देता यावा यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्र्ज देण्याची घोषणा मुुख्यमंत्र्यांनी १० एप्रिलला विधान परिषदेत केली. त्याला महिना उलटला तरी पुढे काहीच झालेले नाही. सहकारमंत्री पाटील आज ‘हे पॅकेज वित्त विभागाकडे अडकले आहे,’ असे सांगत आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केलेले पॅकेज वित्त विभागात अडकते कसे? भाजपचा हा पोरकटपणा नव्हे का? अशी बोचरी विचारणा मुश्रीफ यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली.हसन मुश्रीफ म्हणाले‘एफआरपी’प्रमाणे दर देणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा कच्ची साखर निर्यात अनुदान म्हणजे सरकारचे वरातीमागून घोडे व्यापाऱ्यांसाठीच सरकारचा निर्यात अनुदानाचा निर्णय साखर कारखानदारीला बाहेर काढण्याची जबाबदारी आता सरकारचीचचंद्रकांतदादा म्हणालेदोन हजार कोटी लवकरच देऊराज्यातील ११ लाख टन साखर ‘एफसीआय’मार्फत घ्यावीबाजारभाव व ‘एफआरपी’मध्ये धरलेल्या दरांतील तफावत प्रतिकिलो नऊ रुपये देण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन ब्राझीलमधील साखर उत्पादनामुळे दर कोसळले. एकत्र येऊन मार्ग काढण्याऐवजी सरकारवर खापर फोडणे चुकीचे.