शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रदीप नरकेंच्या मुत्सद्दी रणनीतीचा विजय

By admin | Updated: December 31, 2015 00:35 IST

‘कुंभी-कासारी’ची निवडणूक : विरोधी गटातील असंतुष्टांना गटात आणण्यात नीती; पन्हाळ््याबरोबर करवीरवरही पकड घट्ट करण्यात यश

प्रकाश पाटील-- कोपार्डे--कुंभी-कासारीच्या गेल्या दोन पंचवार्षिक निवणुका एकतर्फी जिंकताना राजकीय व भौगोलिक परिस्थितीचा विचार करीत राजकीय वाटचाल करताना आमदार चंद्रदीप नरके यांनी रणनीतीचा वापर केल्याचे चित्र पाहायला मिळते. चुका टाळत विरोधकांना संयमाने हाताळण्याबरोबर स्वत:चा गट निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्था, शिखर संस्थात आपली स्वत:ची राजकीय ताकद निर्माण केली आहे. त्याचा फायदा आ. नरके यांना यावेळी झाल्याचे एकूण मताधिक्क्यातून स्पष्ट झाले.कुंभी-कासारी निवडणूक जाहीर होण्याअगोदर कार्यक्षेत्रात आ. चंद्रदीप नरके यांच्या विरोधात शाहू आघाडीच्या माध्यमातून एक तगडे पॅनेल देऊन आव्हान निर्माण केले जाणार, असे चित्र होते. त्याला २0१४ मध्ये नुकतीच झालेली विधानसभेची झालर होती. काँग्रेस गटातून आ. नरकेंचे राजकीय बळ असलेली संस्था काढून घेतल्यास त्यांचे खच्चीकरण करता येईल, असा विरोधकांचा कयास होता. त्यादृष्टीने काँग्रेस पर्यायाने शाहू आघाडीची गोळाबेरीज सुरू होती. शाहू आघाडीच्या काही नेत्यांनी संदीप नरकेंनी सुरू केलेल्या आ. नरकेंच्या विरोधी भूमिकेचा राजकीय फायदा घेण्यासाठी ही सत्तेची साठमारी करण्याचे तंत्र अवलंबिले. मात्र, ऐनवेळी राजकीय व वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यातच नेतृत्वाचा मुद्दा जो विरोधी आघाडीला कायम भेडसावत होता. त्यानेच डोके वर काढल्याने शाहू आघाडीत बिघाडी झाली. माघारीच्या शेवटच्या दिवशी लढण्याआधीच माघारी घेत मातब्बरांनी रणांगणातून पळ काढला. मात्र, याला सर्वस्वी पी. एन. पाटील यांना जबाबदार धरीत त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यात आले.‘कुंभी’ची निवडणूक बिनविरोध होणार, अशा हालचाली सुरू झाल्या. मात्र, बचाव मंचचे प्रमुख बाजीराव खाडे यांनी केवळ अर्ध्या तासात पूर्ण नसेना; पण पॅनेल तयार केले. १८0 गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कुंभीच्या कार्यक्षेत्रात सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक, राजकीय पाठबळाबरोबर मनुष्यबळही कमी पडले.मात्र, आ. चंद्रदीप नरके यांनी याउलट आपल्या राजकीय वाटचालीत झालेल्या चुकांमधून सुधारणा करीत विरोधकांना व्यासपीठावर बसण्यासाठी राजकीय कुटनीतीचा वापर केला. विरोधाला विरोध न करता विरोध कसा मावळेल याचा विचार केला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन राजकीय गट गावागावांत तयार केले. विरोधकांबरोबर समझोता करीत व्यासपीठावर आणले. अनेक गावांत एकतर्फी नरके गटाबाबतच कुंभीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले. यातून विरोधकही नाऊमेद होतानाचे चित्र पाहायला मिळाले.प्रगतीचा अहवालच आ. चंद्रदीप नरके यांनी झंझावती प्रचार दौरा करुन गावागावात कुंभीच्या सभासदांना विश्वासू राखण्याची प्रतिमा कायम टिकावी म्हणून आपण केलेल्या कुंभीतील प्रगतीचा अहवालच मांडला. एवढेच नाही तर एफ. आर. पी प्रमाणे सातत्याने जिल्ह्यातील नव्हे तर राज्यात उस उत्पादक सभासदांना उच्चांकी एफ.आर. पी. दिल्याचे ठासून सांगितले. यातून विरोधक मावळलेच त्याचबरोबर कुंभीच्या राखण्या म्हणजे नरके घराणे असे वारे वाहू लागले. याचा परिणाम कारखान्याच्या पॅनेलला मिळाला. ७५00 ते ९ हजार मताधिक्याने विजय मिळवत आ. चंद्रदीप यांनी आपल्या चौफेर राजकिय रणनितीचे दर्शन घडविले आहे.चुका टाळत विरोधकांना संयमाने हाताळले.स्वत:ची राजकीय ताकद निर्माण केली