शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

चांदोली, वारणा धरणग्रस्तांचा १ मार्चपासून पुन्हा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले, परंतु गेल्या अकरा महिन्यात केलेल्या मागण्यांची पूर्तता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले, परंतु गेल्या अकरा महिन्यात केलेल्या मागण्यांची पूर्तता झालेली नसल्यामुळे आता चांदोली अभयारण्यग्रस्त व वारणा धरणग्रस्त येत्या १ मार्चपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या मांडणार आहेत. श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्यातर्फे मारुती पाटील यांनी तसे निवेदन गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे.

चांदोली व वारणा प्रकल्पात विस्थापित झालेल्यांना निर्वाह भत्यासह जमिनीला जमीन देऊन पुनर्वसन, वसाहतीमध्ये मुलभूत सुविधा या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्याच दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आणि लॉकडाऊन जाहीर झाल्याने यात स्वत: लक्ष घालतो, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आश्वासित केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर निर्वाह भत्यांचे काही प्रमाणात वाटप सोडले तर इतर प्रश्नांकडे प्रशासनाने लक्षच दिलेले नसल्याने या प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळेच त्यांनी आता न्यायासाठी पुन्हा एकदा कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.