शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘चांदोली’ विस्थापितांना जमिनी मिळणार

By admin | Updated: September 7, 2016 00:58 IST

अप्पर जिल्हाधिकारी : वनविभागाच्या जागांबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविणार

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यातील विस्थापितांना द्याव्या लागणाऱ्या वनविभागाच्या जमिनीबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविला जाईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिली.विविध भागांतील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत श्रमिक मुक्ती दल व जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यात चांदोली अभयारण्यातील, सर्फनाला, चित्री, चिकोत्रा, आंबेओहळ, वारणा धरणग्रस्तांना मिळालेल्या नसलेल्या जमिनी, अपुऱ्या नागरी सुविधा, आदी प्रश्नांबाबत चर्चा झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर म्हणाले, चांदोली अभयारण्य, वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन ३५ वर्षे उलटली, तरी अद्यापही त्यांना शंभर टक्के जमीन मिळालेली नाही. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या नागरी सुविधांची कमतरता आहे. धरणग्रस्तांना पूर्ण जमीन द्यावी शिवाय चांगल्या नागरी सुविधा देण्यात याव्यात. राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई म्हणाले, आंबेओहळ, चित्री, चिकोत्रा आदी धरणग्रस्तांच्या जमिनी तसेच अन्य प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. यावर अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी चांदोली अभयारण्यातील विस्थापितांना जी वनजमीन द्यायला लागते. त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाला पाठविण्यात येईल, असे सांगितले तसेच कमी पडणारी ५३० हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्याने याबाबत शासनाकडे निधी मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. धरणग्रस्तांच्या वसाहतींना महसुली ग्रामपंचायती जाहीर करण्याची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण केली जाईल. नागरी सुविधांची पूर्तता करण्याची कार्यवाहीला गती दिली जाईल, असे सांगितले. सकारात्मक चर्चा वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन ३५ वर्षे, तर चांदोली अभयारण्यातील लोकांचे विस्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत. मात्र, त्यांना अद्यापही पूर्ण जमिनीचे वाटप झाले नसल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा प्रमुख मारुती पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, पुनर्वसनातील ९०९ खातेदार असून यातील २०३ जणांना आतापर्यंत अंशत: जमिनीचे वाटप झाले आहे. ७०६ खातेदारांना एकही गुंठा जमीन मिळालेली नाही.