शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

‘चांदोली’ विस्थापितांना जमिनी मिळणार

By admin | Updated: September 7, 2016 00:58 IST

अप्पर जिल्हाधिकारी : वनविभागाच्या जागांबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविणार

कोल्हापूर : चांदोली अभयारण्यातील विस्थापितांना द्याव्या लागणाऱ्या वनविभागाच्या जमिनीबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठविला जाईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी मंगळवारी येथे दिली.विविध भागांतील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत श्रमिक मुक्ती दल व जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यात चांदोली अभयारण्यातील, सर्फनाला, चित्री, चिकोत्रा, आंबेओहळ, वारणा धरणग्रस्तांना मिळालेल्या नसलेल्या जमिनी, अपुऱ्या नागरी सुविधा, आदी प्रश्नांबाबत चर्चा झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर म्हणाले, चांदोली अभयारण्य, वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन ३५ वर्षे उलटली, तरी अद्यापही त्यांना शंभर टक्के जमीन मिळालेली नाही. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या नागरी सुविधांची कमतरता आहे. धरणग्रस्तांना पूर्ण जमीन द्यावी शिवाय चांगल्या नागरी सुविधा देण्यात याव्यात. राज्य कार्यालय प्रमुख संपत देसाई म्हणाले, आंबेओहळ, चित्री, चिकोत्रा आदी धरणग्रस्तांच्या जमिनी तसेच अन्य प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. यावर अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी चांदोली अभयारण्यातील विस्थापितांना जी वनजमीन द्यायला लागते. त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाला पाठविण्यात येईल, असे सांगितले तसेच कमी पडणारी ५३० हेक्टर जमीन उपलब्ध होत नसल्याने याबाबत शासनाकडे निधी मागणी करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. धरणग्रस्तांच्या वसाहतींना महसुली ग्रामपंचायती जाहीर करण्याची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण केली जाईल. नागरी सुविधांची पूर्तता करण्याची कार्यवाहीला गती दिली जाईल, असे सांगितले. सकारात्मक चर्चा वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन होऊन ३५ वर्षे, तर चांदोली अभयारण्यातील लोकांचे विस्थापन होऊन २० वर्षे झाली आहेत. मात्र, त्यांना अद्यापही पूर्ण जमिनीचे वाटप झाले नसल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा प्रमुख मारुती पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, पुनर्वसनातील ९०९ खातेदार असून यातील २०३ जणांना आतापर्यंत अंशत: जमिनीचे वाटप झाले आहे. ७०६ खातेदारांना एकही गुंठा जमीन मिळालेली नाही.